अ‍ॅपशहर

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; PM मोदींनी मारला अजय देवगणचा 'हा' फेमस डायलॉग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोनाच्या सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ज्या राज्यांमध्ये करोना रुग्णसंख्या अधिक आहे. त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्ास सोबत पंतप्रधान मोदींनी आधी चर्चा केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2020, 10:35 pm
नवी दिल्लीः देशात पुन्हा करोना रुग्णांची संख्या ( coronavirus india ) वेगाने वाढत आहे. काही ठिकाणी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि नागरिकांमध्ये करोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. करोनाचा वाढता उद्रेक पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी ( pm modi ) यांनी आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक ( meeting with cms on covid19 ) घेतली. या राज्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. करोना संसर्ग गंभीरपणे घेण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी हा मुद्दा हलक्या अंदाजात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि अभिनेता अजय देवगणचा ( ajay devgan ) डायलॉग मारत सर्वांना इशाराही दिला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ajay devgan - pm modi
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; PM मोदींनी मारला अजय देवगनचा 'हा' फेमस डायलॉग


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनादरम्यान 'दिलवाले' या चित्रपटातील अभिनेता अजय देवगणचा एक लोकप्रिय डायलॉग मारला. त्यांनी सर्वांना सावध केलं. 'मेरी कश्ती वहीं डूबी, जहां पानी कम था' असं म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणातून कायम शेर-ओ-शायरी आणि कवितांचे ऐकवताना दिसून येतात.

पतंप्रधान मोदी जो डायलॉक बोलले तो ‘दिलवाले’ हा चित्रपट १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजय देवगणने हा डायलॉग म्हटला होता. या चित्रपटात अजय देवगण सुनील शेट्टी आणि रविना टंडन हे मुख्य भूमिकेत होते. परेश रावल यांचीही महत्वाची भूमिका होती.

निष्काळजीपणा चालणार नाही

आपल्याकडे आता पुरेसा डेटा आहे. अशा परिस्थितीत पूर्ण तयारी आवश्यक आहे. सुरुवातीला करोनाची नागरिकांमध्ये भीती होती. त्या भीतीने नागरिकांनी आत्महत्याही केल्या. करोनावरून नागरिक एकमेकांकडे संशयाने पाहात होते. आता नागरिक करोनाबद्दल गंभीर बनत आहेत. पण करोना व्हायरस हा पूर्वीपेक्षा कमकुवत झाला आहे, असं नागरिकांना वाटत असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

सोशल मीडियाचे बादशहा PM मोदीच, ३३६ कोटी रुपये ब्रँड व्हॅल्यू!

'करोना लस केव्हा येणार हे पंतप्रधान मोदीही ठरवू शकत नाही'

काही नागरिक आता निष्काळजीपणे वावरत आहेत. पण हे योग्य नाही. आपत्तीच्या खोल समुद्रातून आपण किनाऱ्याकडे वाटचाल करत आहोत. ज्या देशांमध्ये करोना रुग्ण कमी होत होते, तिथेही आता नवीन रुग्ण वाढू लागले आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाने अधिक सावध राहिलं पाहिजे. आपल्याला मृत्यू दर १ टक्क्यापेक्षाही खाली ठेवण्याची गरज आहे, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज