वृत्तसंस्था, नवी दिल्ली
‘पंजाबमधील जनता आम आदमी पक्षाला या निवडणुकीत गाशा गुंडाळायला लावेल,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून टीका करणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला रविवारी प्रत्युत्तर दिले.
‘जे पंजाबमध्ये सत्तेची स्वप्ने पाहत आहेत, त्यांना पंजाबमधील जनता गाशा गुंडाळायला लावेल. त्यांना दिल्लीत परत पाठवताना ‘आधी दिल्लीकरांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करायला सांगा,’ असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी रविवारी फरिदकोट येथील रॅलीत केले; तसेच ‘हे बाहेरचे लोक असून, त्यांना मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या विरोधात उभे राहण्याची संधी देऊ नका. जी व्यक्ती अण्णा हजारेंसारख्या व्यक्तीला न्याय देऊ शकली नाही, ती व्यक्ती प्रकाशसिंग बादल यांच्याबाबत चांगले बोलेल, याची अपेक्षा कशी ठेवता येईल? राज्य सरकारमध्ये अजिबात भ्रष्टाचार नसून विरोधकांकडून सरकारची प्रतिमा मलीन करण्यात येत आहे. शिरोमणी अकाली दल - भाजप सरकारने अनेक विकासकामे केली असून, मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी पंजाबला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे,’ असेही मोदी म्हणाले.
मोदी यांनी या रॅलीत काँग्रेसचाही समाचार घेतला. ‘काँग्रेसने पंजाबमधील सरदारांना यापूर्वी दहशतवादी संबोधण्याचे पाप केले. आता ते पंजाबमधील तरुणांना नशेखोर संबोधत आहेत.’
‘पंजाबमधील जनता आम आदमी पक्षाला या निवडणुकीत गाशा गुंडाळायला लावेल,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून टीका करणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाला रविवारी प्रत्युत्तर दिले.
‘जे पंजाबमध्ये सत्तेची स्वप्ने पाहत आहेत, त्यांना पंजाबमधील जनता गाशा गुंडाळायला लावेल. त्यांना दिल्लीत परत पाठवताना ‘आधी दिल्लीकरांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करायला सांगा,’ असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी रविवारी फरिदकोट येथील रॅलीत केले; तसेच ‘हे बाहेरचे लोक असून, त्यांना मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या विरोधात उभे राहण्याची संधी देऊ नका. जी व्यक्ती अण्णा हजारेंसारख्या व्यक्तीला न्याय देऊ शकली नाही, ती व्यक्ती प्रकाशसिंग बादल यांच्याबाबत चांगले बोलेल, याची अपेक्षा कशी ठेवता येईल? राज्य सरकारमध्ये अजिबात भ्रष्टाचार नसून विरोधकांकडून सरकारची प्रतिमा मलीन करण्यात येत आहे. शिरोमणी अकाली दल - भाजप सरकारने अनेक विकासकामे केली असून, मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी पंजाबला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे,’ असेही मोदी म्हणाले.
मोदी यांनी या रॅलीत काँग्रेसचाही समाचार घेतला. ‘काँग्रेसने पंजाबमधील सरदारांना यापूर्वी दहशतवादी संबोधण्याचे पाप केले. आता ते पंजाबमधील तरुणांना नशेखोर संबोधत आहेत.’