नवी दिल्ली:
नवीन वर्षातील पहिल्याच मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर, सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदी, २०१९मधील लोकसभा निवडणुका आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. पुढील लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध 'आघाडी' नव्हे, तर जनता विरुद्ध 'आघाडी' अशीच होईल, असं म्हणत त्यांनी थेट महाआघाडीवर निशाणा साधला. देशातील जनतेचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. २०१९चा अजेंडा जनताच ठरवणार आहे. 'आघाडी'च्या बातम्या यायला सुरुवात झाल्यापासून सर्व निवडणुकांमध्ये त्यांची अवस्था बिकट झाली आहे. आतापर्यंत 'आघाडी' सपशेल अपयशी ठरल्याचं दिसत आहे, असंही ते म्हणाले.
'नोटाबंदी हा झटका नव्हता'
नोटाबंदीचा निर्णय हा देशातील नागरिकांसाठी झटका नव्हता. त्याबाबत आम्ही वर्षभरापूर्वीच इशारा दिला होता. तुमच्याकडे काळा पैसा असेल तर तो जमा करू शकता. पण मोदीदेखील इतरांप्रमाणेच कामे करत असतील, असा लोकांचा गैरसमज झाला आणि खूप कमी लोकांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, असं मोदींनी सांगितलं. देशात काळे धन असल्याच्या बातम्या धडकत होत्या. समांतर अर्थव्यवस्था असल्याचं वृत्त कुणीच नाकारत नव्हतं. नेते, व्यापारी आणि सरकारी बाबूंच्या घरातून रोकड जप्त केली जात होती. समांतर अर्थव्यवस्थेनं देशाला कमकुवत केलं. पण नोटाबंदीनं देशाला बळ दिलं, असंही त्यांनी सांगितलं.
'उर्जित पटेल यांनी स्वतःहून राजीनामा दिला'
कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला. दबावामुळं पटेल यांनी राजीनामा दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्याबाबत मोदींनी स्पष्टीकरण दिलं. पटेल यांनी स्वतःच वैयक्तिक कारणांमुळं पद सोडत असल्याचं कारण दिलं होतं. ६-७ महिन्यांपासून ते राजीनाम्यासंबंधी माझ्याशी बोलत होते. त्यांनी लेखी विनंतीही केली होती. राजकीय दबावाचा प्रश्नच येत नाही. त्यांनी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून चांगले काम केले आहे, असंही ते म्हणाले.
नवीन वर्षातील पहिल्याच मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर, सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदी, २०१९मधील लोकसभा निवडणुका आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. पुढील लोकसभा निवडणूक मोदी विरुद्ध 'आघाडी' नव्हे, तर जनता विरुद्ध 'आघाडी' अशीच होईल, असं म्हणत त्यांनी थेट महाआघाडीवर निशाणा साधला.
'नोटाबंदी हा झटका नव्हता'
नोटाबंदीचा निर्णय हा देशातील नागरिकांसाठी झटका नव्हता. त्याबाबत आम्ही वर्षभरापूर्वीच इशारा दिला होता. तुमच्याकडे काळा पैसा असेल तर तो जमा करू शकता. पण मोदीदेखील इतरांप्रमाणेच कामे करत असतील, असा लोकांचा गैरसमज झाला आणि खूप कमी लोकांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, असं मोदींनी सांगितलं. देशात काळे धन असल्याच्या बातम्या धडकत होत्या. समांतर अर्थव्यवस्था असल्याचं वृत्त कुणीच नाकारत नव्हतं. नेते, व्यापारी आणि सरकारी बाबूंच्या घरातून रोकड जप्त केली जात होती. समांतर अर्थव्यवस्थेनं देशाला कमकुवत केलं. पण नोटाबंदीनं देशाला बळ दिलं, असंही त्यांनी सांगितलं.
'उर्जित पटेल यांनी स्वतःहून राजीनामा दिला'
कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला. दबावामुळं पटेल यांनी राजीनामा दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्याबाबत मोदींनी स्पष्टीकरण दिलं. पटेल यांनी स्वतःच वैयक्तिक कारणांमुळं पद सोडत असल्याचं कारण दिलं होतं. ६-७ महिन्यांपासून ते राजीनाम्यासंबंधी माझ्याशी बोलत होते. त्यांनी लेखी विनंतीही केली होती. राजकीय दबावाचा प्रश्नच येत नाही. त्यांनी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून चांगले काम केले आहे, असंही ते म्हणाले.