नवी दिल्लीः आपले सरकार 'हाय-प्रोफाइल' फरारी आर्थिक गुन्हेगारांना घरी ( pm modi on economic offences ) आणण्यासाठी सर्व मार्गांचा उपयोग करत आहे. आणि त्यांच्याकडे देशात परतण्याशिवाय पर्याय नाही. कर्जपुरवठा आणि आर्थिक वाढ या विषयावरील चर्चेला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. 'आम्ही धोरणे आणि कायद्यांवर अवलंबून आहोत आणि फरारी आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्यासाठी राजनयिक माध्यमांचाही वापर केला आहे. संदेश अगदी स्पष्ट आहे... आपल्या देशात परत या. यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत', असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
विजय मल्ल्या आणि नीरव मोदीला इशारा
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात कोणत्याही आर्थिक गुन्हेगाराचे नाव घेतले नाही. पण आपल्या सरकारने काही काळापासून विजय मल्ल्या आणि नीरव मोदीसारख्या फरारी आर्थिक गुन्हेगारांच्या हस्तांतरासाठी प्रयत्न तीव्र केले आहेत. सक्रियता दाखवून थकबाकीदारांकडून ५ लाख कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. नुकतीच स्थापन झालेली नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (NARCL) २ लाख कोटी रुपयांची तणावग्रस्त मालमत्ता निकाली काढण्यास मदत करेल, असे ते म्हणाले.
'बँकांची स्थिती सुधारेल'
२०१४ मध्ये आपले सरकार आल्यापासून बँकांच्या स्थितीत खूप सुधारणा झाली आहे. भारतीय बँका आता देशाच्या अर्थव्यवस्थेत नवीन ऊर्जा ओतण्यासाठी मजबूत स्थितीत आहेत. यामुळे भारताचा स्वावलंबी होण्याचा मार्ग मोकळा होईल. बँकांना आपल्यासोबतच देशाचे 'वही-खाते' सुधारण्यासाठी सक्रियपणे काम करावे लागेल, असे ते म्हणाले.
बँकांना दिला सल्ला
बँकांना आता जुन्या संस्कृतीपासून दूर राहावे लागेल आणि व्यावसायिक क्षेत्रांची भरभराट होण्यासाठी 'मंजुरी देणार्या' मानसिकतेपासून दूर राहावे लागेल. बँकांनी व्यवसाय जगतासोबत भागीदारीचे मॉडेल स्वीकारावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
priyanka gandhi : प्रियांका गांधींवर कविता चोरीचा गंभीर आरोप; 'तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कविता नाही'
बँकिंग सुधारणांकडून मदत
गेल्या सहा-सात वर्षांत त्यांच्या सरकारने केलेल्या सुधारणांमुळे बँकिंग क्षेत्राची स्थिती मजबूत झाल्याबद्दल त्यांनी सांगितले. आम्ही बँकांची एनपीए समस्या सोडवली आहे. बँकांमध्ये नवीन भांडवल टाकले आहे. दिवाळखोरी कायदा आणला आहे आणि कर्ज वसुली न्यायाधिकरणाला अधिकार देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.
utpal parrikar : मनोहर पर्रीकरांच्या पुत्राचा भाजपला इशारा; म्हणाले, 'पणजीतून उमेदवारी न दिल्यास...'
'बँकांनी आता ग्राहकांपर्यंत पोहोचावे'
त्यांनी बँकर्सना कंपन्या आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) उपाय प्रदान करण्यास सांगितले. ग्राहकांच्या बँकेत येण्याची वाट पाहत बसू नका. तुम्हाला त्यांच्याकडे जावे लागेल. गेल्या पाच वर्षात बँकांची अनुत्पादीत मालमत्ता (NPA) सर्वात कमी आहे. बँकांकडे चलनाची पुरेशी तरलता आहे. कोविड संकटातही आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बँकिंग क्षेत्र मजबूत राहिले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्थांनीही या क्षेत्राची परिस्थिती सुधारली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
विजय मल्ल्या आणि नीरव मोदीला इशारा
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात कोणत्याही आर्थिक गुन्हेगाराचे नाव घेतले नाही. पण आपल्या सरकारने काही काळापासून विजय मल्ल्या आणि नीरव मोदीसारख्या फरारी आर्थिक गुन्हेगारांच्या हस्तांतरासाठी प्रयत्न तीव्र केले आहेत. सक्रियता दाखवून थकबाकीदारांकडून ५ लाख कोटी रुपये वसूल करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. नुकतीच स्थापन झालेली नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (NARCL) २ लाख कोटी रुपयांची तणावग्रस्त मालमत्ता निकाली काढण्यास मदत करेल, असे ते म्हणाले.
'बँकांची स्थिती सुधारेल'
२०१४ मध्ये आपले सरकार आल्यापासून बँकांच्या स्थितीत खूप सुधारणा झाली आहे. भारतीय बँका आता देशाच्या अर्थव्यवस्थेत नवीन ऊर्जा ओतण्यासाठी मजबूत स्थितीत आहेत. यामुळे भारताचा स्वावलंबी होण्याचा मार्ग मोकळा होईल. बँकांना आपल्यासोबतच देशाचे 'वही-खाते' सुधारण्यासाठी सक्रियपणे काम करावे लागेल, असे ते म्हणाले.
बँकांना दिला सल्ला
बँकांना आता जुन्या संस्कृतीपासून दूर राहावे लागेल आणि व्यावसायिक क्षेत्रांची भरभराट होण्यासाठी 'मंजुरी देणार्या' मानसिकतेपासून दूर राहावे लागेल. बँकांनी व्यवसाय जगतासोबत भागीदारीचे मॉडेल स्वीकारावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
priyanka gandhi : प्रियांका गांधींवर कविता चोरीचा गंभीर आरोप; 'तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कविता नाही'
बँकिंग सुधारणांकडून मदत
गेल्या सहा-सात वर्षांत त्यांच्या सरकारने केलेल्या सुधारणांमुळे बँकिंग क्षेत्राची स्थिती मजबूत झाल्याबद्दल त्यांनी सांगितले. आम्ही बँकांची एनपीए समस्या सोडवली आहे. बँकांमध्ये नवीन भांडवल टाकले आहे. दिवाळखोरी कायदा आणला आहे आणि कर्ज वसुली न्यायाधिकरणाला अधिकार देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.
utpal parrikar : मनोहर पर्रीकरांच्या पुत्राचा भाजपला इशारा; म्हणाले, 'पणजीतून उमेदवारी न दिल्यास...'
'बँकांनी आता ग्राहकांपर्यंत पोहोचावे'
त्यांनी बँकर्सना कंपन्या आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) उपाय प्रदान करण्यास सांगितले. ग्राहकांच्या बँकेत येण्याची वाट पाहत बसू नका. तुम्हाला त्यांच्याकडे जावे लागेल. गेल्या पाच वर्षात बँकांची अनुत्पादीत मालमत्ता (NPA) सर्वात कमी आहे. बँकांकडे चलनाची पुरेशी तरलता आहे. कोविड संकटातही आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बँकिंग क्षेत्र मजबूत राहिले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संस्थांनीही या क्षेत्राची परिस्थिती सुधारली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.