अ‍ॅपशहर

बलुचिस्तानात मोदींच्या फोटोसह फडकला तिरंगा

बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळावे यासाठी बलुचिस्तानवाद्यांनी आज पुन्हा पाकिस्तानविरोधात जोरदार निदर्शने केली. बलुचिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचा झेंडा जाळल्यानंतर आज तिथे भारताचा झेंडा फडकला. त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बलुचिस्तानवादींचे नेते आणि त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राण गमावणारे अकबर बुगती यांच्याबरोबरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटोसुद्धा आदोलकांनी झळकावले. पाकिस्तानसाठी ही धोक्याची घंटाच मानली जात आहे.

Maharashtra Times 24 Aug 2016, 8:50 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm modis pictures and indian flag raised during protests in balochistan
बलुचिस्तानात मोदींच्या फोटोसह फडकला तिरंगा


बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळावे यासाठी बलुचिस्तानवाद्यांनी आज पुन्हा पाकिस्तानविरोधात जोरदार निदर्शने केली. बलुचिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचा झेंडा जाळल्यानंतर आज तिथे भारताचा झेंडा फडकला. त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बलुचिस्तानवादींचे नेते आणि त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राण गमावणारे अकबर बुगती यांच्याबरोबरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटोसुद्धा आदोलकांनी झळकावले. पाकिस्तानसाठी ही धोक्याची घंटाच मानली जात आहे.

एएनआय या वृतसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार,बलुचिस्तानमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाकिस्तानी राजवटीविरोधात आंदोलन-निदर्शनं सुरू आहेत. सुई, डेरा बुगती, जाफराबाद, नसिराबादसहित बलुचिस्तान प्रांतातील अनेक शहरांमध्ये पाकिस्तानी अत्याचाराविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे.

बलुचिस्तानमधील नागरिकांवर पाकिस्तानकडून होणाऱ्या अत्याचारांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं होतं. तेव्हापासून बलुचिस्तानातील नेते मोदींच्या प्रेमातच पडलेत. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी मोदींनी यूएनमध्ये प्रयत्न करावेत, असं आवाहनच तिथल्या अनेक नेत्यांनी केलं होतं. त्यानंतर, स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करतानाही मोदींनी बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख केला होता. त्यामुळे पाकचा तीळपापड झाला होता.

या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील विधानसभेने मंगळवारी मोदींविरोधात निंदाप्रस्ताव संमत केला. मोदींचे उघडपणे समर्थन केल्याच्या आरोपाखाली बलुची नेते ब्रह्मदाग बुगती हरबियार मारी आणि बनुक करिमा बलूच यांच्याविरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे.




पाकिस्तान इथे नरसंहार करत आहे. रोज पाकिस्तानी सैन्य अनेक युवकांना ठार मारत असून अनेकजण बेपत्ता आहेत. अशावेळी, पंतप्रधान मोदींनी हा विषय जाहीरपणे मांडल्याने इथल्या जनतेचा दाबला जाणारा आवाज जगभरात पोहोचला आहे, अशा शब्दांत ब्रह्मदाग बुगती यांनी मोदींचे आभार मानले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज