अ‍ॅपशहर

कॅशलेस व्यवहारांसाठी आजपासून 'लकी डॉ'!

देशात कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाटी आजपासून 'भाग्यवान ग्राहक योजना' सुरू होत असून त्याद्वारे डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना पुढचे १०० दिवस भरघोस बक्षीसं जिंकण्याची संधी मिळणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमात केली.

Maharashtra Times 25 Dec 2016, 3:46 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm narendra modi launch two new schemes for customers and traders on christmas
कॅशलेस व्यवहारांसाठी आजपासून 'लकी डॉ'!


देशात कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाटी आजपासून 'भाग्यवान ग्राहक योजना' सुरू होत असून त्याद्वारे डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना पुढचे १०० दिवस भरघोस बक्षीसं जिंकण्याची संधी मिळणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमात केली.

५० रुपयांपासून ३ हजार रुपयांपर्यंतची खरेदी डिजिटल पद्धतीने करणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारच्या 'भाग्यवान ग्राहक योजने'मध्ये सहभागी होता येईल. या योजनेअंतर्गत पुढील १०० दिवस रोज १५ हजार ग्राहकांना एक-एक हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार असून या ग्राहकांची निवड 'लकी ड्रॉ'मधून केली जाणार आहे. त्याशिवाय, आठवड्यात एक मोठा ड्रॉ काढण्यात येईल आणि त्यातील भाग्यवान विजेत्यांना लक्षाधीश होण्याची संधी मिळेल. तसंच, सगळ्यात मोठा बंपर ड्रॉ १४ एप्रिलला - बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी काढण्यात येणार आहे. त्याचं बक्षीस कोटींमध्ये असेल, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. व्यापाऱ्यांनी डिजिटल व्हावं म्हणून सरकारनं 'डिजी धन व्यापार योजना' सुरू केली असून त्यात कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यापाऱ्यांना बक्षीसं दिली जाणार असल्याचंही मोदींनी जाहीर केलं. गेल्या काही दिवसांत कॅशलेस व्यवहारांत २०० ते ३०० टक्क्यांनी वाढ झाल्याचं नमूद करत, नोटाबंदीला समर्थन देणाऱ्या जनतेचे त्यांनी आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा २०१६ मधील शेवटचा 'मन की बात' कार्यक्रम होता. त्यात त्यांनी नोटाबंदी, कॅशलेस व्यवहार, संसदेतील गोंधळ, स्टार्ट अप मोहीम या विषयांवर सविस्तर मतं मांडली. तसंच, भारतीय क्रिकेट संघाचं, हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या महिला संघांचं आणि ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप विजेत्या भिडूंचं कौतुकही केलं. मोदींनी नागरिकांना नाताळ आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.

मदनमोहन मालवीय यांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याचा पंतप्रधान मोदींनी गौरव केला. त्याचप्रमाणे, अणुक्षेत्रात देशाला स्वतःच्या पायावर उभं करणारे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं योगदान कुणीही विसरू शकत नाही, अशा भावना व्यक्त करत त्यांनी अटलजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज