नवी दिल्ली, वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणपणी रोज रात्री विविध विषयांवर देवी 'जगत जननी'ला उद्देशून लिहिलेली पत्रे पुढील महिन्यात पुस्तकरूपात इंग्रजीतून प्रकाशित होणार आहेत. हे पुस्तक हार्परकोलिन्स इंडिया प्रकाशित करणार असून मूळ गुजरातीमध्ये लिहिलेली पत्रे प्रख्यात सिनेसमीक्षक भावना सोमय्या यांनी इंग्रजीत भाषांतरित केली आहेत. या पुस्तकाचे नाव 'लेटर्स टू मदर' असे आहे. ते ई-बुक स्वरूपातही प्रकाशित होणार आहे.
ही पत्रे मोदी यांनी १९८६मध्ये लिहिलेल्या रोजनिशीतून घेतलेली आहेत. 'हा काही साहित्यिक लिखाणाचा प्रयत्न नाही. तर यामध्ये त्याकाळातील माझ्या निरीक्षणांचे प्रतिबिंब आणि जे जाणवले त्या विचारांचा लेखाजोखा आहे, अशा भावना मोदी यांनी या निमित्ताने व्यक्त केल्या आहेत. 'मी लेखक नाही. आपल्यापैकी अनेक जण तसे नसतोही, पण प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात. माझ्या मनातही अशा भावनांचा कल्लोळ उठला की कागद आणि पेन हाती घेण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नसतो. लिखाण आवश्यक नाही, पण आत्मावलोकन आणि आपल्या मेंदूत आणि मनात नेमके काय चालले आहे, हे सांगणे गरजेचे आहे', असेही ते म्हणाले.
तरुणपणी मोदी हे रोज रात्री झोपण्यापूर्वी 'जगत जननी'ला उद्देशून पत्र लिहित. त्यात वेगवेगळे विषय असत. कधी दु:खाचे, कधी आनंदाचे तर कधी त्यांच्या आठवणींचा त्यात उल्लेख असायचा. मोदी यांच्या लिखाणात तरुणपणीचा उत्साह आणि बदल घडवून आणण्याच्या उत्कटतेचे प्रतिबिंब दिसते. परंतू दर काही महिन्यांनी ते आपण लिहिलेली ही पत्रे फाडून टाकत किंवा जाळून टाकत. १९८६मध्ये लिहिलेल्या दैनंदिनीची पाने मात्र सांभाळून ठेवली होती. तीच आता वाचकांसाठी इंग्रजीतून उपलब्ध होणार असल्याचे प्रकाशकांनी म्हटले आहे. सोमय्या यांच्या मते, मोदी यांच्या लिखाणाचे बलस्थान त्यातील भावनात्मकता हीच आहे. त्यात आवेग, अस्वस्थता आहे, जी लपवण्याचा प्रयत्न त्यांनी अजिबात केलेला नाही, तेच त्यांचे आकर्षण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणपणी रोज रात्री विविध विषयांवर देवी 'जगत जननी'ला उद्देशून लिहिलेली पत्रे पुढील महिन्यात पुस्तकरूपात इंग्रजीतून प्रकाशित होणार आहेत. हे पुस्तक हार्परकोलिन्स इंडिया प्रकाशित करणार असून मूळ गुजरातीमध्ये लिहिलेली पत्रे प्रख्यात सिनेसमीक्षक भावना सोमय्या यांनी इंग्रजीत भाषांतरित केली आहेत. या पुस्तकाचे नाव 'लेटर्स टू मदर' असे आहे. ते ई-बुक स्वरूपातही प्रकाशित होणार आहे.
ही पत्रे मोदी यांनी १९८६मध्ये लिहिलेल्या रोजनिशीतून घेतलेली आहेत. 'हा काही साहित्यिक लिखाणाचा प्रयत्न नाही. तर यामध्ये त्याकाळातील माझ्या निरीक्षणांचे प्रतिबिंब आणि जे जाणवले त्या विचारांचा लेखाजोखा आहे, अशा भावना मोदी यांनी या निमित्ताने व्यक्त केल्या आहेत. 'मी लेखक नाही. आपल्यापैकी अनेक जण तसे नसतोही, पण प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात. माझ्या मनातही अशा भावनांचा कल्लोळ उठला की कागद आणि पेन हाती घेण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नसतो. लिखाण आवश्यक नाही, पण आत्मावलोकन आणि आपल्या मेंदूत आणि मनात नेमके काय चालले आहे, हे सांगणे गरजेचे आहे', असेही ते म्हणाले.
तरुणपणी मोदी हे रोज रात्री झोपण्यापूर्वी 'जगत जननी'ला उद्देशून पत्र लिहित. त्यात वेगवेगळे विषय असत. कधी दु:खाचे, कधी आनंदाचे तर कधी त्यांच्या आठवणींचा त्यात उल्लेख असायचा. मोदी यांच्या लिखाणात तरुणपणीचा उत्साह आणि बदल घडवून आणण्याच्या उत्कटतेचे प्रतिबिंब दिसते. परंतू दर काही महिन्यांनी ते आपण लिहिलेली ही पत्रे फाडून टाकत किंवा जाळून टाकत. १९८६मध्ये लिहिलेल्या दैनंदिनीची पाने मात्र सांभाळून ठेवली होती. तीच आता वाचकांसाठी इंग्रजीतून उपलब्ध होणार असल्याचे प्रकाशकांनी म्हटले आहे. सोमय्या यांच्या मते, मोदी यांच्या लिखाणाचे बलस्थान त्यातील भावनात्मकता हीच आहे. त्यात आवेग, अस्वस्थता आहे, जी लपवण्याचा प्रयत्न त्यांनी अजिबात केलेला नाही, तेच त्यांचे आकर्षण आहे.