वृत्तसंस्था, पाटणा
बिहार विधानसभा तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तीन पेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण केले. राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कामाचे कौतुक करत 'बिहार हे गुणवत्तेचे कोठार आहे,' अशा शब्दांत त्यांनी बिहारींची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.
येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी ९०० कोटी रुपयांच्या तीन पेट्रोलिअम प्रकल्पांचे लोकार्पण केले. यात प. बंगालमधील दुर्गापूर ते बिहारमधील बांकादरम्यान विस्तारित करण्यात आलेल्या गॅसवाहिनीचा समावेश आहे. बांकामध्येच एलपीजी गॅस सिंलिंडरमध्ये भरण्याच्या प्रकल्पही उभारण्यात आला असून असेच आणखी एक युनिट प. चंपारण्य जिल्ह्यात हरसिद्धी येथे आहे.
'गॅसवाहिन्यांच्या कामाचे उद्घाटन दीड वर्षांपूर्वी माझ्या हस्ते झाले होते. आज ते पूर्ण झाल्याचे पाहताना मला आनंद होत आहे. उद्घाटन झाल्यानंतर काम पूर्ण होण्यासाठी पिढ्यानपिढ्या वाट पाहण्याचा बिहार तसेच देशामधील काळ आता गेला. नितीश कुमार यांनी राज्यात हा बदल घडवून आणण्यात मोठा भूमिका बजावली आहे,' असे प्रमाणपत्र मोदी यांनी दिले. पंतप्रधानांनी बांका आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या आंगिका बोलीभाषेत भाषणाची सुरुवात केली. त्यांनी नवी दिल्ली येथून लोकांशी ऑनलाइन संवाद साधला.
'बिहार हे कला, संस्कृती आणि खाद्यपदार्थांचे कौतुक करत मोदी यांनी बिहार हे गुणवत्तेचे कोठार आहे. असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आयआयटीसह सर्व दर्जेदार ठिकाणी बिहारमधील लोक दिसतात. बिहारमधील अनेक बुद्धिमान लोक केंद्रात महत्त्वाच्या जागांवर काम करत आहेत. आम्ही बिहारचे ऋणी आहोत,' अशा शब्दांत मोदी यांनी बिहारप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
बिहार विधानसभा तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तीन पेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण केले. राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कामाचे कौतुक करत 'बिहार हे गुणवत्तेचे कोठार आहे,' अशा शब्दांत त्यांनी बिहारींची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.
येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी ९०० कोटी रुपयांच्या तीन पेट्रोलिअम प्रकल्पांचे लोकार्पण केले. यात प. बंगालमधील दुर्गापूर ते बिहारमधील बांकादरम्यान विस्तारित करण्यात आलेल्या गॅसवाहिनीचा समावेश आहे. बांकामध्येच एलपीजी गॅस सिंलिंडरमध्ये भरण्याच्या प्रकल्पही उभारण्यात आला असून असेच आणखी एक युनिट प. चंपारण्य जिल्ह्यात हरसिद्धी येथे आहे.
'गॅसवाहिन्यांच्या कामाचे उद्घाटन दीड वर्षांपूर्वी माझ्या हस्ते झाले होते. आज ते पूर्ण झाल्याचे पाहताना मला आनंद होत आहे. उद्घाटन झाल्यानंतर काम पूर्ण होण्यासाठी पिढ्यानपिढ्या वाट पाहण्याचा बिहार तसेच देशामधील काळ आता गेला. नितीश कुमार यांनी राज्यात हा बदल घडवून आणण्यात मोठा भूमिका बजावली आहे,' असे प्रमाणपत्र मोदी यांनी दिले. पंतप्रधानांनी बांका आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या आंगिका बोलीभाषेत भाषणाची सुरुवात केली. त्यांनी नवी दिल्ली येथून लोकांशी ऑनलाइन संवाद साधला.
'बिहार हे कला, संस्कृती आणि खाद्यपदार्थांचे कौतुक करत मोदी यांनी बिहार हे गुणवत्तेचे कोठार आहे. असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आयआयटीसह सर्व दर्जेदार ठिकाणी बिहारमधील लोक दिसतात. बिहारमधील अनेक बुद्धिमान लोक केंद्रात महत्त्वाच्या जागांवर काम करत आहेत. आम्ही बिहारचे ऋणी आहोत,' अशा शब्दांत मोदी यांनी बिहारप्रती कृतज्ञता व्यक्त केली.