अ‍ॅपशहर

पारंपरिक औषधोपचारासाठी WHO ने केली भारताची निवड; मोदी म्हणाले...

भारतात करोना विषाणूच्या संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे आणि यामध्ये पारंपरिक उपचार पद्धतीचे अतिशय मोठे योगदान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

मिसकायरा.कॉम 13 Nov 2020, 2:36 pm
नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पारंपरिक उपचार पद्धतीचे जागतिक केंद्राची निर्मिती करण्यासाठी भारताची निवड केली आहे. ही अभिमानाची गोष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे. मोदी यांनी पाचव्या आयुर्वेदिक दिनानिमित्त दोन आयुर्वेद संस्थांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी आयुर्वेद हा भारताचा वारसा असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या जामनगर येथे आयुर्वेद शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे (ITRA) तर, जयपूर येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्था (NIA) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. भारतात करोनाची स्थिती नियंत्रणात असून यामध्ये पारंपरिक उपचार पद्धतीचे अतिशय मोठे योगदान आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पारंपरिक औषधोपचारासाठी WHO ने केली भारताची निवड


घरगुती इम्युनिटी बूस्टर्सनी करोनापासून बचाव केला

पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, 'आज ब्राझील देशाच्या राष्ट्रीय धोरणात आयुर्वेदाचा समावेश आहे. भारत-अमेरिका असोत किंवा मग भारत-जर्मनी यांचे संबंध असोत, आयुष आणि पारंपरिक उपचार पद्धतीशी जोडलेले सहकार्य सतत वाढत आहे. करोनाशी लढण्यासाठी जेव्हा कोणताही प्रभावी मार्ग उपलब्ध नव्हता, तेव्हा भारतातील घरा-घरात हळद, काढा, दूध अशा सारख्या रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे पदार्थ कामी आले. इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या आमच्या देशात करोना नियंत्रणात राहण्याचे जर कोणते कारण असेल तर ते आमची पारंपरिक उपचार पद्धतीच आहे. करोनाच्या काळात संपूर्ण जगात आयुर्वेदिक उत्पादनांची मागणी जलदगतीने वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सप्टेंबर महिन्यात आयुर्वेदिक उत्पादनांची निर्यात दीडपट वाढली आहे. मसाल्यांच्या निर्यातीत देखील या कालावधीत चांगली वाढ झाली आहे.'

'आरोग्याचा वारसा आधुनिक गरजांच्या हिशेबाने विकसित करणे गरजेचे'

जगभरात आयुर्वेदिक उपचार आणि भारतीय मसाल्यांवर विश्वास वाढत चालला आहे. आता तर अनेक देशांमध्ये हळदीशी संबंधित विशेष पेय पदार्थांचा देखील वापर वाढत चालला आहे. जगातील प्रतिष्ठित मेडिकल जर्नलने देखील आयुर्वेदात नवी आशा पाहिली आहे, असे मोदी पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- दहशतवाद्यांच्या यादीवरून भारत खवळला; पाकिस्तानवर केले 'हे' आरोप

भारताकडे आरोग्याशी संबंधित कितीतरी मोठा वारसा आहे. मात्र बहुतेक ज्ञान पुस्तकांमध्ये आहे, शास्त्रांमध्ये आहे आणि थोडे ज्ञान आजीच्या बटव्यात आहे. हे ज्ञान आधुनिक आवश्यकतेनुसार विकसित करणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- चक्रीवादळ-पूरग्रस्त ६ राज्यांना केंद्राची ४,३८१ कोटी रुपयांची अतिरिक्त मदत
क्लिक करा आणि वाचा- Twitter भारतात होऊ शकते ब्लॉक; शनिवारपर्यंत द्यावे लागणार उत्तर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज