हनुमानगड (राजस्थान):
पाकिस्तानमधील करतारपूर गुरुद्वारावरून गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून टीका झेलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर उत्तर दिलं आहे. फाळणीवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी समजूतदारपणा, संवेदनशीलता आणि गांभीर्य दाखवलं असतं तर करतारपूर भारतापासून वेगळं होऊन पाकिस्तानात गेलं नसतं, असं म्हणत मोदींनी सगळं खापर काँग्रेसवर फोडलं.
राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी हनुमानगडमध्ये जाहीर सभा घेतली. त्यात त्यांनी करतारपूर गुरुद्वारावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. भाजपतून काँग्रेसवासी झालेले नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर करतारपूर कॉरिडोरचा मुद्दा चांगलाच तापला आहे. काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पाकिस्तानबाबत सौम्य धोरण अवलंबणाऱ्या सिद्धूंवर भाजपनं हल्ला केल्यानंतर सिद्धूंनीही थेट मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यांच्या टीकेला मोदींनी राजस्थानच्या भूमीतून उत्तर दिलंय. 'सत्तेचा मोह आपण समजू शकतो, पण सत्तेसाठी काँग्रेसनं केलेल्या चुकांची शिक्षा आजपर्यंत भोगायला लागतेय. काँग्रेसची प्रत्येक घोडचूक सुधारण्याचं काम माझ्या नशिबी आलंय आणि माझे नशीब देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या हातात आहेत,' असं मोदी म्हणाले.
पाकिस्तानमधील करतारपूर गुरुद्वारावरून गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून टीका झेलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर उत्तर दिलं आहे. फाळणीवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी समजूतदारपणा, संवेदनशीलता आणि गांभीर्य दाखवलं असतं तर करतारपूर भारतापासून वेगळं होऊन पाकिस्तानात गेलं नसतं, असं म्हणत मोदींनी सगळं खापर काँग्रेसवर फोडलं.
राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी हनुमानगडमध्ये जाहीर सभा घेतली. त्यात त्यांनी करतारपूर गुरुद्वारावरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. भाजपतून काँग्रेसवासी झालेले नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर करतारपूर कॉरिडोरचा मुद्दा चांगलाच तापला आहे. काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पाकिस्तानबाबत सौम्य धोरण अवलंबणाऱ्या सिद्धूंवर भाजपनं हल्ला केल्यानंतर सिद्धूंनीही थेट मोदींवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यांच्या टीकेला मोदींनी राजस्थानच्या भूमीतून उत्तर दिलंय. 'सत्तेचा मोह आपण समजू शकतो, पण सत्तेसाठी काँग्रेसनं केलेल्या चुकांची शिक्षा आजपर्यंत भोगायला लागतेय. काँग्रेसची प्रत्येक घोडचूक सुधारण्याचं काम माझ्या नशिबी आलंय आणि माझे नशीब देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या हातात आहेत,' असं मोदी म्हणाले.