अ‍ॅपशहर

काश्मीरवर फारुक अब्दुल्लांची नवी खोडी

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष खासदार फारुख अब्दुल्ला यांनी ‌शनिवारी भारतावर आगपाखड केली. भारताने जम्मू-काश्मीरला फसविल्याचा कांगावाही त्यांनी केला.

Maharashtra Times 12 Nov 2017, 2:26 am
वृत्तसंस्था, श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pok belongs to pak jk part of india farooq abdullah
काश्मीरवर फारुक अब्दुल्लांची नवी खोडी


जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष खासदार फारुख अब्दुल्ला यांनी ‌शनिवारी भारतावर आगपाखड केली. भारताने जम्मू-काश्मीरला फसविल्याचा कांगावाही त्यांनी केला.

‘भारताने आम्हाला योग्य वागविले नाही. भारताने आम्हाला फसविले. ज्यासाठी आम्ही भारतात सामील झालो त्या प्रेमाला त्यांनी कधीच स्वीकारले नाही. त्यामुळेच काश्मीरमध्ये आजची परिस्थिती ओढविली आहे’, असा दावा अब्दुल्ला यांनी केला.

‘जो भाग पाकिस्तानकडे आहे तो पाकिस्तानचा आहे आणि राहिलेला भाग हा भारताचा आहे. त्यांना शांतता हवी असेल तर पाकिस्तानशी बोलावे लागेल. तसेच आम्हाला आणि त्यांनाही स्वायत्तता द्यावी लागेल. पाकिस्तानच्या मंत्र्यांनी योग्यच म्हटले आहे. जो भाग तुमच्याकडे (भारत) आहे तो सामीलीकरणाचा वापर करून ताब्यात घेतला आहे. हा भाग आमचा आहे असे तुम्ही म्हणत असाल तर सामीलीकरणही लक्षात ठेवावे लागेल’, असे सांगत अब्दुल्ला म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील हा मुद्दा आहे. भारत सरकारला पाकिस्तानशी चर्चा करावीच लागेल कारण काश्मीरचा भाग त्यांच्याकडेही आहे. दोन्ही देशांनी आणि दोन्ही बाजूच्या काश्मीरमधील लोकांनी एकत्र बसून सध्याच्या सीमा कायम ठेवून अंतर्गत स्वायत्ततेवर चर्चा केली पाहिजे.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज