अ‍ॅपशहर

गुरुग्राममध्ये लग्न सोहळ्यातही पोलीस कारवाई होणार, मास्क न घालणारे पाहुणे टार्गेटवर

करोना रुग्णांची संख्या अनेक राज्यांमध्ये पुन्हा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्य सरकारांनी करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. आता हरयाणामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस आता लग्न सोहळण्यांमध्ये तपासणी करतील.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2020, 12:13 am
गुरुग्राम: हरयाणाच्या गुरुग्राममध्ये विवाह सोहळ्याचे आयोजन आता पोलीस अधिकारी ( gurugram police ) तसेच प्रशासकीय अधिकारीही करतील. कारण करोना व्हायरस ( coronavirus ) साथीच्या काळात मोठ्या समारंभात जारी केलेले प्रोटोकॉल तपासणं बंधनकारक आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gurugram police
लग्न सोहळ्यात मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई होणार, पाहुण्यांना धास्ती ( प्रातिनिधिक फोटो )


गुरुग्रामचे पोलीस आयुक्त के. के. राव यांनी यासंदर्भात आदेश जारी केलेत. कुठल्याही निमंत्रणाशिवाय पोलीस शहरातील कोणत्याही लग्न समारंभात उपस्थित राहू शकतात आणि मास्क न घालणाऱ्यांना दंडही करू शकतात. पोलीस पाहुण्यांवर लक्ष ठेवतील आणि करोनो व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्याचं आवाहन करतील, असं आयुक्तांनी आदेशत म्हटलं आहे.

हरयाणामध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोमवारी राज्यात २६६३ नवीन रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या ही २,१९,९६३ इतकी झाली आहे. तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांची संख्या वाढून २,२१६ वर पोचली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने ताजी आकडेवारी दिलीय. गुरुग्राम जिल्ह्यात सर्वाधिक ८६६ नवीन रुग्ण आढळलेत. तर फरीदाबादमध्ये ५७७ नवीन आढळलेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज