केरळः लग्नाला अवघे २० दिवसांनंतर एका दाम्पत्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. नवरा- नवरीसोबत नदीकिनारी फोटोशूट करताना अपघात झाला हे फोटोशूट वधु-वरांच्या जीवावर बेतलं आहे. केरळमधील जानकीकाडूनजवळीच कुट्टियाडी नदीच्या ठिकाणी ही घटना घडली असून यात एकाचा मृत्यू झाला आहे.
फोटोशूट सुरू असताना अचानक नवरदेवाचा पाय सरकला आणि नवरीदेखील वाहत्या पाण्यात कोसळली. या घटनेत नवरदेवाचा बुडून मृत्यू झाला आहे. तर नवरी पाण्यात बुडताना पाहून तिला वाचवण्यात यश आलं असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाचाः खरा देवमाणूस! जीवावर उदार होत आगीत फसलेल्या चिमुकल्याला पोलिसाने वाचवले
सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून हे दाम्पत्य फोटोशूट करत होते. १४ मार्च रोजी रोजी दोघांचे लग्न झाले होते. मात्र, काही कारणांमुळं त्यांच्या लग्नाचे फोटोशूट लांबणीवर पडले होते. त्यामुळं त्यांनी चार एप्रिलला फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला. मात्र, फोटोशूट सुरु असतानाच ही हृदयद्रावक घटना घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या नवरदेवाचे नाव रेजिल असल्याचं समोर आलं असून तो पेरंबराजवळील कांडियगडचा राहणारा होता.
गेल्या काही महिन्यात कुट्टियाडी नदीजवळ अनेक पर्यटकांच्या मृत्यूचे वृत्त समोर आले आहेत. रेजिललाही पोहता येत नव्हतं. खडाकावरुन पाय घसरल्यानंतर तो नदीतील खोल खड्ड्यात अडकला आणि श्वास गुदमरल्यामुळं त्याचा मृत्यू झाला आहे. या नदीत खोल खड्डे आहेत अनेक पर्यटकांना नदीमधील खोल खड्ड्यांबाबत माहिती नसते त्यामुळं ते उत्साहाच्या भरात नदीत जातात, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
वाचाः ... आणि डोळ्यात पाणी आलं; राज ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर मनसे पदाधिकाऱ्याची नाराज
फोटोशूट सुरू असताना अचानक नवरदेवाचा पाय सरकला आणि नवरीदेखील वाहत्या पाण्यात कोसळली. या घटनेत नवरदेवाचा बुडून मृत्यू झाला आहे. तर नवरी पाण्यात बुडताना पाहून तिला वाचवण्यात यश आलं असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाचाः खरा देवमाणूस! जीवावर उदार होत आगीत फसलेल्या चिमुकल्याला पोलिसाने वाचवले
सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून हे दाम्पत्य फोटोशूट करत होते. १४ मार्च रोजी रोजी दोघांचे लग्न झाले होते. मात्र, काही कारणांमुळं त्यांच्या लग्नाचे फोटोशूट लांबणीवर पडले होते. त्यामुळं त्यांनी चार एप्रिलला फोटोशूट करण्याचा निर्णय घेतला. मात्र, फोटोशूट सुरु असतानाच ही हृदयद्रावक घटना घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या नवरदेवाचे नाव रेजिल असल्याचं समोर आलं असून तो पेरंबराजवळील कांडियगडचा राहणारा होता.
गेल्या काही महिन्यात कुट्टियाडी नदीजवळ अनेक पर्यटकांच्या मृत्यूचे वृत्त समोर आले आहेत. रेजिललाही पोहता येत नव्हतं. खडाकावरुन पाय घसरल्यानंतर तो नदीतील खोल खड्ड्यात अडकला आणि श्वास गुदमरल्यामुळं त्याचा मृत्यू झाला आहे. या नदीत खोल खड्डे आहेत अनेक पर्यटकांना नदीमधील खोल खड्ड्यांबाबत माहिती नसते त्यामुळं ते उत्साहाच्या भरात नदीत जातात, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
वाचाः ... आणि डोळ्यात पाणी आलं; राज ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यानंतर मनसे पदाधिकाऱ्याची नाराज