अ‍ॅपशहर

नेहरू, पटेल, बोस फासावर चढले!: जावडेकर

पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्यलढ्यात फासावर चढावे लागले. ते देशासाठी शहीद झाले', असे विधान केल्याने केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोठा वाद ओढवून घेतला आहे.

Maharashtra Times 23 Aug 2016, 1:27 pm
मटा ऑनलाइन वृत्त । छिंदवाडा (मध्य प्रदेश)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prakash javadekar says nehru and patel were hanged
नेहरू, पटेल, बोस फासावर चढले!: जावडेकर


पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्यलढ्यात फासावर चढावे लागले. ते देशासाठी शहीद झाले', असे विधान केल्याने केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोठा वाद ओढवून घेतला आहे.

छिंदवाडा येथे तिरंगा यात्रेत बोलताना जावडेकर यांनी नेहरू, सरदार पटेल आणि सुभाषबाबूंचं नाव शहीदांच्या यादीत जोडलं. जावडेकर यांनी स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेले क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू यांची नावे घेतली पण त्याचबरोबर नेहरू-पटेल-बोस यांची नावेही घेतल्याने सारेच अवाक् झाले.

दरम्यान, जावडेकर यांच्या या विधानावर चौफेर टीका होऊ लागली असून त्यांच्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

जावडेकर नेमके काय म्हणाले...

१८५७ मध्ये जी लढाई सुरू झाली ती ९० वर्षे चालली. ब्रिटिशांना पिटाळून लावण्यात आलं आणि देश स्वतंत्र झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व वीरांना माझा सलाम आहे. मी त्यांना प्रणाम करतो. किती वीर झाले... सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडित नेहरू, भगतसिंग, राजगुरू हे सर्वजण देशासाठी फासावर चढले...क्रांतिवीर सावरकर आणि आणखी अनेक स्वातंत्र्यसेनांनींनी देशासाठी प्राण त्यागले, असे वक्तव्य जावडेकर यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज