प्रशांत भूषण यांनी पाच ज्येष्ठ न्यायाधीशांकडे केली तक्रार
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच ज्येष्ठ न्यायाधीशांकडे लेखी तक्रार नोंदविली आहे. मेडिकल कॉलेज लाच प्रकरणात उच्च न्यायालयाच्या एका विद्यमान न्यायाधीशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास न्या. दीपक मिश्रा यांनी रोखल्याचा आरोप भूषण यांनी केला आहे. विशेष म्हणजे न्या. मिश्रा यांच्या विरोधात बंड करणाऱ्या चार सहकारी न्यायाधीशांकडे त्यांनी ही तक्रार केली आहे.
प्रशांत भूषण यांनी ‘कॅम्पेन फॉर ज्युडिशियल अकाऊंटिबिलिटी अँड रिफॉर्म्स’ या संस्थेच्या वतीने न्या. मिश्रा यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीची विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. भूषण यांनी न्या. दीपक मिश्रा यांच्या व्यतिरिक्त न्या. जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ यांच्याकडे ही तक्रार केली आहे. ‘मेडिकल कॉलेज घोटाळ्यात गंभीर आरोप झाल्यानंतरही सरन्यायाधीशांनी प्रसाद एज्युकेशन या संस्थेची बाजू घेतली आणि या प्रकरणांची सुनावणी तीन कनिष्ठ न्यायाधीशांकडे सोपविली. ६ नोव्हेंबर, २०१७ रोजी न्या. दीपक मिश्रा यांनी दिलेला आदेश चुकीचा होता’, असा दावा भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
‘या प्रकरणात काही लोकांवर सीबीआयने पाळत ठेवली होती आणि काही लोकांचे दूरध्वनीही सीबीआयने टॅप केले होते. ही पाळत ठेवली जात असताना आरोपी न्यायाधीशांना पैसे देण्याचीही चर्चा करीत होते. सीबीआयला उच्च न्यायालयाच्या एका मुख्य न्यायाधीशाला पैसे स्वीकारताना मुद्देमालासह पकडायचे होते. पण सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सीबीआयला तशी परवानगी दिली नाही. सरन्यायाधीशांच्या परवानगीशिवाय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविरुद्ध गुन्हा दाखल करता येत नाही’, असा दावा भूषण यांनी केला.
भूखंड प्रकरणातही तक्रार
‘दीपक मिश्रा यांनी वकील असताना चुकीचे प्रतिज्ञापत्र देऊन भूखंड घेतला होता. १९८५ साली त्यांचा हा भूखंड उपजिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला. पण मिश्रा यांनी भूखंडावरील ताबा सन २०१२मध्ये सोडला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन विद्यमान न्यायाधीशांची समिती स्थापन करून न्या. मिश्रा यांच्याशी संबंधित तक्रारींची दखल घ्यावी’, अशी मागणी भूषण यांनी केली.
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच ज्येष्ठ न्यायाधीशांकडे लेखी तक्रार नोंदविली आहे. मेडिकल कॉलेज लाच प्रकरणात उच्च न्यायालयाच्या एका विद्यमान न्यायाधीशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास न्या. दीपक मिश्रा यांनी रोखल्याचा आरोप भूषण यांनी केला आहे. विशेष म्हणजे न्या. मिश्रा यांच्या विरोधात बंड करणाऱ्या चार सहकारी न्यायाधीशांकडे त्यांनी ही तक्रार केली आहे.
प्रशांत भूषण यांनी ‘कॅम्पेन फॉर ज्युडिशियल अकाऊंटिबिलिटी अँड रिफॉर्म्स’ या संस्थेच्या वतीने न्या. मिश्रा यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीची विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. भूषण यांनी न्या. दीपक मिश्रा यांच्या व्यतिरिक्त न्या. जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ यांच्याकडे ही तक्रार केली आहे. ‘मेडिकल कॉलेज घोटाळ्यात गंभीर आरोप झाल्यानंतरही सरन्यायाधीशांनी प्रसाद एज्युकेशन या संस्थेची बाजू घेतली आणि या प्रकरणांची सुनावणी तीन कनिष्ठ न्यायाधीशांकडे सोपविली. ६ नोव्हेंबर, २०१७ रोजी न्या. दीपक मिश्रा यांनी दिलेला आदेश चुकीचा होता’, असा दावा भूषण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
‘या प्रकरणात काही लोकांवर सीबीआयने पाळत ठेवली होती आणि काही लोकांचे दूरध्वनीही सीबीआयने टॅप केले होते. ही पाळत ठेवली जात असताना आरोपी न्यायाधीशांना पैसे देण्याचीही चर्चा करीत होते. सीबीआयला उच्च न्यायालयाच्या एका मुख्य न्यायाधीशाला पैसे स्वीकारताना मुद्देमालासह पकडायचे होते. पण सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सीबीआयला तशी परवानगी दिली नाही. सरन्यायाधीशांच्या परवानगीशिवाय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविरुद्ध गुन्हा दाखल करता येत नाही’, असा दावा भूषण यांनी केला.
भूखंड प्रकरणातही तक्रार
‘दीपक मिश्रा यांनी वकील असताना चुकीचे प्रतिज्ञापत्र देऊन भूखंड घेतला होता. १९८५ साली त्यांचा हा भूखंड उपजिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला. पण मिश्रा यांनी भूखंडावरील ताबा सन २०१२मध्ये सोडला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन विद्यमान न्यायाधीशांची समिती स्थापन करून न्या. मिश्रा यांच्याशी संबंधित तक्रारींची दखल घ्यावी’, अशी मागणी भूषण यांनी केली.