मुंबई : मुख्यमंत्रिपदावरून सेनेशी संघर्ष विकोपास गेल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यात नेमके काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या आत्ताच्या विधानसभेची मुदत आज, शनिवारी संपत आहे. अशा स्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राज्याचे राजकीय भवितव्य बऱ्याच अंशी अवलंबून आहे. सद्यस्थितीत एखाद्या पक्षाने सत्तेसाठी दावा केल्यास त्याची चाचपणी करून योग्य निर्णय घेणे, अन्य पर्याय उपलब्ध नसल्यास राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणे आदी पर्याय राज्यपालांकडे उपलब्ध असतील. आत्ताच्या परिस्थितीत भाजपकडे सर्वाधिक आमदार असले तरी एकंदर गुंता पाहता तो पक्ष सत्तेसाठी दावा करणे कठीण मानले जात आहे. शिवसेनाही नेमके काय करणार, हे स्पष्ट न झाल्याने सध्या तरी त्याबाबत संभ्रमावस्थाच आहे.
राष्ट्रपती राजवट? की अन्य पर्याय?
मुख्यमंत्रिपदावरून सेनेशी संघर्ष विकोपास गेल्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यात नेमके काय ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Nov 2019, 4:00 am