नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता रेडिओवरून देशाला संबोधित करणार आहेत. यापूर्वी २७ मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले होते. पंतप्रधान मोदी हे बुधवारी देशाला उद्देशून भाषण करणार होते. मात्र, सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे यात बदल करण्यात आला.
जम्मू-काश्मीर राज्याची पुनर्रचना, नव्या लडाख राज्याची निर्मिती, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० मधील तरतुदी हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत. केंद्राने जम्मू-काश्मीरबाबत जे पाऊल उचलले आहे त्याबाबत नेमकी माहिती जनतेपर्यंत पोहचावी हा यामागचा उद्देश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी २७ मार्च रोजी पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले होते. 'ए-सॅट' क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणाबाबत त्यांनी देशाला माहिती दिली होती. त्यानंतर आजच देशाला उद्देशून होत असलेल्या मोदींच्या भाषणाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
जम्मू-काश्मीर राज्याची पुनर्रचना, नव्या लडाख राज्याची निर्मिती, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० मधील तरतुदी हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत. केंद्राने जम्मू-काश्मीरबाबत जे पाऊल उचलले आहे त्याबाबत नेमकी माहिती जनतेपर्यंत पोहचावी हा यामागचा उद्देश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी २७ मार्च रोजी पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले होते. 'ए-सॅट' क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणाबाबत त्यांनी देशाला माहिती दिली होती. त्यानंतर आजच देशाला उद्देशून होत असलेल्या मोदींच्या भाषणाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.