अ‍ॅपशहर

प्रियांका गांधींवर इराणींची टीका

जनतेच्या प्रश्नांना उत्तरेच नसल्याने प्रियांका गांधी अमेठीत प्रचारासाठी उतरल्या नसल्याची टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. येथील जाहीर सभेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना इराणी म्हणाल्या, की अमेठीत २०१४मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक हरल्यानंतरही आपण जनतेच्या प्रश्नांत लक्ष घालत आहोत.

Maharashtra Times 17 Feb 2017, 3:39 am
कानपूर : जनतेच्या प्रश्नांना उत्तरेच नसल्याने प्रियांका गांधी अमेठीत प्रचारासाठी उतरल्या नसल्याची टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे. येथील जाहीर सभेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना इराणी म्हणाल्या, की अमेठीत २०१४मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक हरल्यानंतरही आपण जनतेच्या प्रश्नांत लक्ष घालत आहोत. त्या उलट प्रियांकांनी मात्र जनतेपासून दूर राहणेच पसंत केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम priyanka gandhi not in campaign as she cant face peoples questions smriti irani
प्रियांका गांधींवर इराणींची टीका


‘प्र‌यिांका जनतेच्या प्रश्नांना सामोऱ्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे इथल्या जनतेपासून लांब राहत आहेत. सपचा स्वतःवर विश्वास नसल्याने त्यांनी काँग्रेसला सोबतीला घेतले आहे,’ असेही इराणी म्हणाल्या. दरम्यान, इराणी यांच्या‌ टीकेवर प्रतिक्र‌यिा देताना बसपा प्रमु्ख मायावती ‘त्यांना केवळ चर्चेत राहण्यात सर आहे,’ असे म्हणाल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज