अ‍ॅपशहर

'सार्क' बहिष्काराची भारताची भूमिका अभिमानास्पद!

उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात होणाऱ्या 'सार्क' परिषदेवर बहिष्कार घालण्याच्या भारत सरकारच्या भूमिकेचं सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. 'भारताची ही ठाम भूमिका अभिमानास्पद आहे,' असं टाटांनी म्हटलं आहे.

Maharashtra Times 29 Sep 2016, 11:14 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम proud of indias stand to boycott saarc ratan tata
'सार्क' बहिष्काराची भारताची भूमिका अभिमानास्पद!


उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात होणाऱ्या 'सार्क' परिषदेवर बहिष्कार घालण्याच्या भारत सरकारच्या भूमिकेचं सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. 'भारताची ही ठाम भूमिका अभिमानास्पद आहे,' असं टाटांनी म्हटलं आहे.

उद्योग क्षेत्र वगळता अन्य कुठल्याही क्षेत्रातील घडामोडींवर रतन टाटा क्वचितच प्रतिक्रिया देतात. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी सरकारनं घेतलेल्या भूमिकेवर मात्र त्यांनी ट्विट केलं आहे. 'सार्क परिषदेवर बहिष्कार घालण्याच्या भारताच्या भूमिकेचा व त्याला इतर सदस्य देशांकडून मिळालेल्या पाठिंब्याचा मला अभिमान वाटतो,' असं टाटांनी म्हटलं आहे. टाटांच्या या ट्विटला ८ हजार लोकांनी पसंती दिली असून ५ हजार लोकांनी रिट्विट केलं आहे. 

So proud of Indian govt's firm stand on bycot of SARC mtg & overwhelming support by member nations. — Ratan N. Tata (@RNTata2000) September 28, 2016 उरी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानात होणाऱ्या सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला आहे. भारताच्या या भूमिकेनंतर अफगाणिस्तान, भूतान व बांगलादेशनंही सार्क परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं पाकिस्तानला सणसणीत चपराक बसल्याचं बोललं जात आहे. 

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज