नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकारकडून सतत अपमानास्पद वागणूक मिळत आहे. पुदुचेरी राज्याला सापत्न पणाची वागणूक मिळत असल्याचा आरोप पुदुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी केला आहे. केंद्र सरकार आमच्यावर अन्याय करीत आहे. आम्हाला कधी केंद्र शासीत प्रदेश म्हणतात तर कधी राज्य म्हणून संबोधतात. या दुटप्पी वागणुकीपेक्षा मोदी सरकारने पुदुचेरी राज्याला एकदाचे तृतियपंथी म्हणून घोषित करावे, अशा तिखट शब्दांत नारायणसामी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
नारायणसामी यांनी गुरुवारी पुदुचेरीमधील एका कार्यक्रमात मोदी सरकारवर सापत्न वागणूक देत असल्याची टीका केली. केंद्र सरकारच्या धोरणामुळे आम्ही ना इकडचे राहिलो ना तिकडचे राहिलो. ते त्यांच्या मर्जीप्रमाणे आमची राज्य म्हणून तर कधी केंद्र शासीत प्रदेश म्हणून गणना करतात. सध्या आमची स्थिती फार चांगली नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून सतत होत असल्याच्या सापत्न वागणुकीमुळे आम्हाला एकदाचे तृतियपंथी (ट्रासजेंडर) म्हणून घोषित करावे, असे ते म्हणाले. पुदुचेरीमधील प्रशासनाला दिल्लीसारखाच त्रास दिला जात आहे, असा आरोप काँग्रेसच्या एका नेत्याने केला आहे. ते म्हणाले, पुदुचेरी आणि दिल्ली दोन्ही राज्य सध्या कठीण स्थितीचा सामना करीत आहेत. विधानसभा असलेल्या केंद्र शासीत प्रदेशांना सध्या त्रास सहन करावा लागत असल्याचेही ते म्हणाले.
जीएसटीचा मुद्दा असेल तर आम्हाला राज्य असल्याप्रमाणे वागणूक दिली जाते. आमच्याकडून पैसे घेतले जाते. परंतु, वेगवेगळ्या योजना लागू करण्याची वेळ आल्यानंतर मात्र आम्हाला केंद्र सरकारकडून केंद्र शासीत प्रदेश असल्याची वागणूक दिली जाते. मुख्यमंत्र्याच्या या वक्तव्यावर उपराज्यपाल किरण बेदी यांनी टीका केली आहे. केंद्र सरकार पुदुचेरीच्या गरजा पूर्ण करण्यासाटी पूर्णपणे संवेदनशील आहे, असे किरण बेदी यांनी म्हटले आहे.
नारायणसामी यांनी गुरुवारी पुदुचेरीमधील एका कार्यक्रमात मोदी सरकारवर सापत्न वागणूक देत असल्याची टीका केली. केंद्र सरकारच्या धोरणामुळे आम्ही ना इकडचे राहिलो ना तिकडचे राहिलो. ते त्यांच्या मर्जीप्रमाणे आमची राज्य म्हणून तर कधी केंद्र शासीत प्रदेश म्हणून गणना करतात. सध्या आमची स्थिती फार चांगली नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून सतत होत असल्याच्या सापत्न वागणुकीमुळे आम्हाला एकदाचे तृतियपंथी (ट्रासजेंडर) म्हणून घोषित करावे, असे ते म्हणाले. पुदुचेरीमधील प्रशासनाला दिल्लीसारखाच त्रास दिला जात आहे, असा आरोप काँग्रेसच्या एका नेत्याने केला आहे. ते म्हणाले, पुदुचेरी आणि दिल्ली दोन्ही राज्य सध्या कठीण स्थितीचा सामना करीत आहेत. विधानसभा असलेल्या केंद्र शासीत प्रदेशांना सध्या त्रास सहन करावा लागत असल्याचेही ते म्हणाले.
जीएसटीचा मुद्दा असेल तर आम्हाला राज्य असल्याप्रमाणे वागणूक दिली जाते. आमच्याकडून पैसे घेतले जाते. परंतु, वेगवेगळ्या योजना लागू करण्याची वेळ आल्यानंतर मात्र आम्हाला केंद्र सरकारकडून केंद्र शासीत प्रदेश असल्याची वागणूक दिली जाते. मुख्यमंत्र्याच्या या वक्तव्यावर उपराज्यपाल किरण बेदी यांनी टीका केली आहे. केंद्र सरकार पुदुचेरीच्या गरजा पूर्ण करण्यासाटी पूर्णपणे संवेदनशील आहे, असे किरण बेदी यांनी म्हटले आहे.