अ‍ॅपशहर

मुंबई हल्ल्यापासून ते पुलवामापर्यंत... भारताने पाकला 'असं' सुनावलं

पुलवामामधील हल्ल्या प्रकरणी एनआयएने आरोपपत्र दाखल केलंय. या आरोपपत्रात पाकिस्तानमधील दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांची नावं आहेत. पुलवामा प्रकरणी पुरावे देऊनही दोषींवर पाकिस्तानने कुठलीही कारवाई केली नाही, असं सांगत भारताने पाकला सुनावलंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Aug 2020, 11:33 pm
नवी दिल्लीः पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या तपासाबाबत परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली. पुलवामा हल्ल्याशी संबंधित पाकिस्तानला पुरेसे पुरावे दिले आहेत. पण पाकिस्तान दोषींवर कारवाई करण्यास सतत टाळाटाळ करत आहे. आमचं ध्येय फक्त निवेदन देणं नाही तर गुन्हेगारांना कायदा आणि न्यायाच्या कक्षेत आणणं आवश्यक आहे, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pulwama attack  (File Photo)
पुलवामा दहशतवादी हल्ला (संग्रहित फोटो)


दीड वर्षांच्या तपासानंतर पुलवामा हल्ल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. दहशतवादी आणि गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आमचं उद्दिष्ट फक्त निवेदनं किंवा सूचना देण्यापूरते मर्यादित नाही', असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं.

स्वदेशी शस्त्रांनी युद्ध जिंकण्याइतका मोठा आनंद कुठलाच नसेलः बिपीन रावत

संरक्षण उत्पादन वाढवणार, प्रगत तंत्रज्ञान देशातच विकसित व्हावंः PM मोदी

परराष्ट्र मंत्रालयाने करून दिली मुंबई हल्ल्याची आठवण

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. ही दहशतवादी संघटना आणि त्याचे म्होरके पाकिस्तानात आहेत. आरोपी मसूद अझरला पाकिस्तानमध्ये आश्रय दिला जात आहे. हे निंदनीय आहे. आम्ही पाकिस्तानला या प्रकरणी पुरेसे पुरावे दिले आहेत. पण पाकिस्तान जबाबदारीपासून पळ काढत आहे. यावेळी परराष्ट्र मंत्रालयानेही मुंबईवरील २००८च्या हल्ल्याची आठवण करून दिली. मुंबई हल्ल्या प्रकरणी पुरावे देऊनही पाकिस्तानने दोषींवर कुठलीही ठोस कारवाई केली नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज