नवी दिल्ली:
राफेल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना सुप्रीम कोर्टालाही 'चौकीदार चोर है' मान्य असल्याचं वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मात्र, त्याआधीच आज राहुल यांनी कोर्टात तीन पानी प्रतिज्ञापत्र दाखल करून केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. 'अनावधानानं कोर्टाच्या हवाल्यानं 'चौकीदार चोर है...' बोललो. तसा माझा कोणताही हेतू नव्हता,' असं राहुल म्हणाले. याआधीही राहुल यांनी कोर्टात दोन प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र, त्यात माफी मागितली नव्हती, तर दिलगिरी व्यक्त केली होती.
काय आहे प्रकरण?
राफेल प्रकरणी निर्णयानंतर सुप्रीम कोर्टानंही 'चौकीदार चोर' असल्याचं मान्य केल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. राहुल यांनी असं वक्तव्य करून कोर्टाचा अपमान केल्याचं सांगत भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सुप्रीम कोर्टानं राहुल यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर राहुल यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.
राफेल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना सुप्रीम कोर्टालाही 'चौकीदार चोर है' मान्य असल्याचं वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मात्र, त्याआधीच आज राहुल यांनी कोर्टात तीन पानी प्रतिज्ञापत्र दाखल करून केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.
काय आहे प्रकरण?
राफेल प्रकरणी निर्णयानंतर सुप्रीम कोर्टानंही 'चौकीदार चोर' असल्याचं मान्य केल्याचं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. राहुल यांनी असं वक्तव्य करून कोर्टाचा अपमान केल्याचं सांगत भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सुप्रीम कोर्टानं राहुल यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर राहुल यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.