अक्षय मुकुल । नवी दिल्ली
राहुल गांधी यांच्या खांद्यावर काँग्रेस पक्षाची धुरा सोपवली जाण्याची जोरदार चर्चा असतानाच राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास भाजपला 'अच्छे दिन' येतील, असे वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे. राहुल यांच्यावर तोफ डागण्याचं कारण विचारता मला पत्रकार प्रश्न विचारतात आणि मी त्याचं उत्तर देते, असं हजरजबाबी उत्तर त्यांनी दिलं.
जेएनयू वाद, रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणि अन्य वादांवर स्मृती इराणी यांनी स्पष्टपणे मते मांडली. रोहित वेमुलाबाबत संसदेत निवेदन देताना मी सगळे पुरावे समोर ठेवले. त्यामुळे विरोधी पक्षाने माझ्याविरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणला नाही. रोहितच्या जातीवर मी कोणतीही टिपण्णी केली नव्हती. मी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. न्याय मागताना जात मध्ये आणली जाऊ नये. न्याय सगळ्यांनाच मिळायला हवा या मताची मी आहे, असे त्यांनी जातीचं राजकारण करणाऱ्यांना सुनावले.
राहुल यांच्या हेतुविषयीही त्यांनी शंका घेतली. या वादांमध्ये माझ्यावर व्यक्तिगत आरोप करण्यात आले. जेएनयूमध्ये २००९ मध्ये लाठीमार झाला होता. तेव्हा राहुल गांधी तिकडे फिरकले नाहीत. आता मात्र दोन-दोनवेळा ते कॅम्पसमध्ये गेले. जे राहुल गांधी अमेठीत एखाद्या ठिकाणी दोनवेळा जात नाहीत त्यांच्या या कॅम्पसवाऱ्यांचा अर्थ काय काढायचा? हे सगळं मला लक्ष्य करण्यासाठीच करण्यात आलं, असा आरोप स्मृती यांनी केला. जेएनयू प्रकरणात सीताराम येचुरी यांनी माध्यमांची दिशाभूल केली असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
राष्ट्रीय शिक्षण धोरणावर आधीच सर्वसहमती झाली आहे. प्रत्येक विभाग, प्रत्येक जिल्हा, सर्व राज्यांशी या धोरणाबाबत चर्चा झाली आहे. लाखो गावांनी हे धोरण कसं असावं, याबाबत मतं नोंदवली आहेत. सर्व स्तरांतील मुलांशी संवाद साधण्यात आला आहे. यूनेस्को, यूनिसेफ यांच्याशीही चर्चा झाली आहे. आता फक्त यावर संसदेत चर्चा व्हायची बाकी आहे. याबाबतची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ती चर्चाही होईल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात स्मृती यांनी सांगितले.
राहुल गांधी यांच्या खांद्यावर काँग्रेस पक्षाची धुरा सोपवली जाण्याची जोरदार चर्चा असतानाच राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास भाजपला 'अच्छे दिन' येतील, असे वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे. राहुल यांच्यावर तोफ डागण्याचं कारण विचारता मला पत्रकार प्रश्न विचारतात आणि मी त्याचं उत्तर देते, असं हजरजबाबी उत्तर त्यांनी दिलं.
जेएनयू वाद, रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणि अन्य वादांवर स्मृती इराणी यांनी स्पष्टपणे मते मांडली. रोहित वेमुलाबाबत संसदेत निवेदन देताना मी सगळे पुरावे समोर ठेवले. त्यामुळे विरोधी पक्षाने माझ्याविरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणला नाही. रोहितच्या जातीवर मी कोणतीही टिपण्णी केली नव्हती. मी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. न्याय मागताना जात मध्ये आणली जाऊ नये. न्याय सगळ्यांनाच मिळायला हवा या मताची मी आहे, असे त्यांनी जातीचं राजकारण करणाऱ्यांना सुनावले.
राहुल यांच्या हेतुविषयीही त्यांनी शंका घेतली. या वादांमध्ये माझ्यावर व्यक्तिगत आरोप करण्यात आले. जेएनयूमध्ये २००९ मध्ये लाठीमार झाला होता. तेव्हा राहुल गांधी तिकडे फिरकले नाहीत. आता मात्र दोन-दोनवेळा ते कॅम्पसमध्ये गेले. जे राहुल गांधी अमेठीत एखाद्या ठिकाणी दोनवेळा जात नाहीत त्यांच्या या कॅम्पसवाऱ्यांचा अर्थ काय काढायचा? हे सगळं मला लक्ष्य करण्यासाठीच करण्यात आलं, असा आरोप स्मृती यांनी केला. जेएनयू प्रकरणात सीताराम येचुरी यांनी माध्यमांची दिशाभूल केली असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
राष्ट्रीय शिक्षण धोरणावर आधीच सर्वसहमती झाली आहे. प्रत्येक विभाग, प्रत्येक जिल्हा, सर्व राज्यांशी या धोरणाबाबत चर्चा झाली आहे. लाखो गावांनी हे धोरण कसं असावं, याबाबत मतं नोंदवली आहेत. सर्व स्तरांतील मुलांशी संवाद साधण्यात आला आहे. यूनेस्को, यूनिसेफ यांच्याशीही चर्चा झाली आहे. आता फक्त यावर संसदेत चर्चा व्हायची बाकी आहे. याबाबतची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ती चर्चाही होईल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात स्मृती यांनी सांगितले.