मोगा: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नव्या कृषी कायद्यांविरोधात पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला आहे. पंजाबच्या मोगा येछे खेती बचाओ अभियानाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सरकारला जर हे विधेयक मंजूर करायचेच होते, तर मग लोकसभा आणि आणि राज्यसभेत त्यावर चर्चा करायला हवी होती, असे सांगतानाच ज्या दिवशी काँग्रेस सत्तेत येईल त्या दिवशी तिन्ही कृषीबाबतचे काळे कायदे केराच्या टोपलीत फेकून देऊ, असे आश्वासन राहुल गांधी यांनी देशातील शेतकऱ्यांना दिले आहे.
काँग्रेस शेतकऱ्यांसोबत उभा आहे
काँग्रेस पक्ष हा देशभरातील शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे असे आश्वासन मी पंजाबच्या शेतकऱ्यांना देतो, असे राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले. काँग्रेसने दिलेल्या आश्वासनापासून आम्ही एक इंच देखील मागे हटणार नाही, असे राहुल सभेत ठामपणे म्हणाले. नरेंद्र मोदी सरकारचा एमएसपी संपवण्याचा इरादा आहे आणि शेतीचा संपूर्ण बाजार अंबानी आणि अदाणी यांच्या हवाली करावा असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र काँग्रेस पक्ष असे होऊ देणार नाही, असेही राहुल पुढे म्हणाले.
जर या नव्या कायद्याचे देशातील शेतकरी समर्थन करत आहेत किंवा खूश आहेत असे म्हटले तर मग शेतकरी देशभरात या कायद्याविरोधात आंदोलने का करत आहेत, असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला. पंजाबमध्ये शेतकरी हे आंदोलन का करत आहेत असे विचारतानाच करोनाच्या या संकटात हे तीन कायदे लागू करण्याची इतकी घाई काय होती, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
'... तर मग शेतकऱ्यांना अंबानी आणि अदाणी यांच्याशी बोलावे लागेल'
शेतकऱ्यांची उत्पादने खरेदी करण्याच्या विद्यमान यंत्रणेत अनेक कमतरता आहे हे आम्हाला मान्य आहे, मात्र या यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, ही यंत्रणा नष्ट करण्याची आवश्यकता नाही. याचे कारण म्हणजे जर का ही यंत्रणा नष्ट झाली, तर मग शेतकऱ्यांकडे काहीच उरणार नाही. असे झाल्यास शेतकऱ्यांना थेट अंबानी आणि अदाणी यांच्याशीच बोलावे लागेल आणि या चर्चेत शेतकरी मारला जाईल, असे राहुल गांधी म्हणाले.
हे मोदींचे नाही, अंबानी-अदाणींचे सरकार आहे
देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे, मात्र ते चुकीचे आहे, देशात मोदींचे सरकार नसून अंबानी आणि अदाणी यांचे सरकार आहे, असे राहुल गांधी म्हणाले. नरेंद्र मोदी यांना अंबानी आणि अदाणी चालवतात, जीवन देतात. यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर केला जातो, असे एकापेक्षा एक गंभीर आरोप राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केले. मोदी या मंडळींसाठी जमीन साफ करतात आणि ही मंडळी मग मोदी यांना समर्थन देतात, असेही राहुल पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- डॉक्टरांनाही बसला धक्का; रुग्णाच्या पोटातून निघाल्या ३०० ग्राम लोखंडी वस्तू
या वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी ट्रॅ्क्टर रॅली काढली.
क्लिक करा आणि वाचा- coronavirus in india: देशात फक्त २९ दिवसांत वाढले ३० लाख नवे रुग्ण
क्लिक करा आणि वाचा- हाथरस: प्रियांका गांधींचे उत्तर प्रदेश सरकारला तीन प्रश्न?, म्हणाल्या...
काँग्रेस शेतकऱ्यांसोबत उभा आहे
काँग्रेस पक्ष हा देशभरातील शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे असे आश्वासन मी पंजाबच्या शेतकऱ्यांना देतो, असे राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले. काँग्रेसने दिलेल्या आश्वासनापासून आम्ही एक इंच देखील मागे हटणार नाही, असे राहुल सभेत ठामपणे म्हणाले. नरेंद्र मोदी सरकारचा एमएसपी संपवण्याचा इरादा आहे आणि शेतीचा संपूर्ण बाजार अंबानी आणि अदाणी यांच्या हवाली करावा असा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र काँग्रेस पक्ष असे होऊ देणार नाही, असेही राहुल पुढे म्हणाले.
जर या नव्या कायद्याचे देशातील शेतकरी समर्थन करत आहेत किंवा खूश आहेत असे म्हटले तर मग शेतकरी देशभरात या कायद्याविरोधात आंदोलने का करत आहेत, असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला. पंजाबमध्ये शेतकरी हे आंदोलन का करत आहेत असे विचारतानाच करोनाच्या या संकटात हे तीन कायदे लागू करण्याची इतकी घाई काय होती, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
'... तर मग शेतकऱ्यांना अंबानी आणि अदाणी यांच्याशी बोलावे लागेल'
शेतकऱ्यांची उत्पादने खरेदी करण्याच्या विद्यमान यंत्रणेत अनेक कमतरता आहे हे आम्हाला मान्य आहे, मात्र या यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, ही यंत्रणा नष्ट करण्याची आवश्यकता नाही. याचे कारण म्हणजे जर का ही यंत्रणा नष्ट झाली, तर मग शेतकऱ्यांकडे काहीच उरणार नाही. असे झाल्यास शेतकऱ्यांना थेट अंबानी आणि अदाणी यांच्याशीच बोलावे लागेल आणि या चर्चेत शेतकरी मारला जाईल, असे राहुल गांधी म्हणाले.
हे मोदींचे नाही, अंबानी-अदाणींचे सरकार आहे
देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे, मात्र ते चुकीचे आहे, देशात मोदींचे सरकार नसून अंबानी आणि अदाणी यांचे सरकार आहे, असे राहुल गांधी म्हणाले. नरेंद्र मोदी यांना अंबानी आणि अदाणी चालवतात, जीवन देतात. यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर केला जातो, असे एकापेक्षा एक गंभीर आरोप राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केले. मोदी या मंडळींसाठी जमीन साफ करतात आणि ही मंडळी मग मोदी यांना समर्थन देतात, असेही राहुल पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- डॉक्टरांनाही बसला धक्का; रुग्णाच्या पोटातून निघाल्या ३०० ग्राम लोखंडी वस्तू
या वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी ट्रॅ्क्टर रॅली काढली.
क्लिक करा आणि वाचा- coronavirus in india: देशात फक्त २९ दिवसांत वाढले ३० लाख नवे रुग्ण
क्लिक करा आणि वाचा- हाथरस: प्रियांका गांधींचे उत्तर प्रदेश सरकारला तीन प्रश्न?, म्हणाल्या...