अ‍ॅपशहर

‘राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करावे’

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा दणकून पराभव झाला आहे. त्यामुळे राहुल यांच्यावर चौफेर टीका होत आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनीच राहुल यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Maharashtra Times 23 Mar 2017, 2:21 am
नवी दिल्लीः काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा दणकून पराभव झाला आहे. त्यामुळे राहुल यांच्यावर चौफेर टीका होत आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनीच राहुल यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, अशा परिस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी मात्र त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देऊन राहुल यांना काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी केली आहे. ‘काँग्रेसने आता सर्वसमावेशक पक्ष होऊन सरकारविरोधात सर्वसमावेशक आघाडी तयार करायला हवी,’ असेही अय्यर यांचे म्हणणे आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली मते मांडली आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul gandhi must be made congress chief mani shankar aiyar
‘राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करावे’


नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यानंतर पक्षात अनेक बदल करण्याची मागणी जोर धरत आहे. या विषयी ते म्हणाले, ‘गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसचे नेतृत्व राहुल यांच्या हातात आहे. आता ते नेतृत्वाच्या भूमिकेत रूळत आहेत. त्यामुळे आपल्या विचारांनुसार त्यांना लोकशाहीवादी पक्ष तयार करता येईल.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज