नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या १० लाख नोकऱ्यांच्या घोषणेवरुन टीका केली आहे. मोदी सरकारनं येत्या दिड वर्षात १० लाख नोकऱ्या देणार असल्याचं जाहीर केलंय. राहुल गांधी यांनी ट्विट करत हे जुमला नाहीतर महाजुमला सरकार असल्याचं म्हटलंय. राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करताना जुन्या आश्वासनाची आठवण करुन दिली आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार ८ वर्षांपूर्वी सत्तेत आलं त्यावेळी दरवर्षी २ कोटी नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्याप्रमाणं आता १० लाख नोकऱ्यांचं आश्वासन देण्यात आलं आहे. हे जुमला सरकार नाही तर महाजुमला सरकार असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
८ वर्षांपूर्वी २ कोटी, आता १० लाख नोकऱ्या, हे जुमला नाही महाजुमला सरकार: राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी १० लाख पदांच्या नोकरभरतीवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. हे जुमला नाही तर महाजुमला सरकार असल्याची टीका राहुल गांधी यांनी केलाय.
हायलाइट्स:
- राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
- जुमला नाही तर महाजुमला सरकार
- नरेंद्र मोदी नोकऱ्यांच्या बातम्या करतात