अ‍ॅपशहर

मोदींच्या राज्यात सवाल केल्यास गोळ्या घातल्या जातात: राहुल

राजस्थानच्या रायपूरमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या युवा आक्रोश रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. केंद्रातील मोदी सरकारने सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या भारताची प्रतिमा नष्ट केली आहे. आज संपूर्ण जगात भारताकडे 'रेप कॅपिटल' म्हणून पाहिलं जातंय. पंतप्रधान मोदी त्यावर बोलत नाहीत. देशातील तरुणांनी त्याबाबत सवाल केला तर त्यांच्यावर गोळी घातल्या जातेय, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2020, 7:09 pm
जयपूर: राजस्थानच्या रायपूरमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या युवा आक्रोश रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. केंद्रातील मोदी सरकारने सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या भारताची प्रतिमा नष्ट केली आहे. आज संपूर्ण जगात भारताकडे 'रेप कॅपिटल' म्हणून पाहिलं जातंय. पंतप्रधान मोदी त्यावर बोलत नाहीत. देशातील तरुणांनी त्याबाबत सवाल केला तर त्यांच्यावर गोळी घातल्या जातेय, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul


राहुल गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त करतानाच भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यूपीए सरकारच्या काळात विकास दर ९ टक्के होता. आता मोदी सरकार नव्या पद्धतीने जीडीपीचा दर निश्चित करते. तरीही विकास दर ५ टक्के इतकाच आहे. अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून २१व्या शतकातील भारत आपली पूंजी वाया घालवत आहे, अशी राहुल यांनी केली. मोदी सरकारने योग्य पद्धतीने जीडीपी दर मोजला तर विकास दर अडिच टक्केच असल्याचं दिसून येईल. यूपीएच्या काळात आम्ही गरिबांना पैसे द्यायचो. त्यामुळे अर्थव्यवस्था चालत होती. गरिबांच्या खिशात पैसे गेले तरच अर्थव्यवस्था चालते. त्यांच्या खिशात पैसा गेला तरच ते माल खरेदी करतात. मोदी सरकारने तर गरिबांच्या खिशातून पैसा काढून उद्योगपतींचे खिसे भरले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

CAA विरोध: शर्जील इमामला बिहारमधून अटक

रोहयो, अन्नाचा अधिकार आदी यूपीए सरकारच्या योजनांचा मोदी सरकारने बोजवारा उडवला आहे. नोटबंदी करून गरिबांचा पैसा १५ ते २० उद्योगपतींच्या खिशात टाकले आहेत. गरिबांजवळचा पैसा संपला आणि मालाची खरेदीही संपली आहे. त्यामुळे देशात ४५ वर्षांतील सर्वात मोठी गरिबी आली आहे, असं ते म्हणाले.

कन्हैय्यापेक्षाही शर्जीलची भाषा खतरनाक: शहा

मोदींना आव्हान

यावेळी त्यांनी मोदींना विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचं आव्हान दिलं. मोदींनी भारतातील कोणत्याही विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करावी. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असं आव्हान राहुल यांनी मोदींना दिलं. मोदी कोणत्याही विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समोरे जाऊ शकत नाहीत. ते फक्त खोटी आश्वासनं देऊ शकतात, असंही ते म्हणाले. मोदींनी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र गेल्या वर्षी भारतातील एक कोटी तरुणांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. एनआरसीवर बोललं जाईल. सीएएवर बोललं जाईल. एनपीआरवरही बोललं जाईल. पण देशातील सर्वात मोठ्या समस्येवर आपले पंतप्रधान ब्र शब्दही काढणार नाहीत, असा टोलाही त्यांनी हाणला.

पाकिस्तानला १० दिवसांत धूळ चारू: PM मोदी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज