अ‍ॅपशहर

भाजप आणि मोदींवर राहुल यांचे व्यंग

काँग्रेसच्या जनवेदना संमेलनातून पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यंग करत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विचारधारेवर हल्ला केला. भाजपची विचारधारा भीती निर्माण करणारी आहे. तर भीती दूर करण्याचे काँग्रेसचे काम आहे, अशी टीका राहुल यांनी केली.

Maharashtra Times 11 Jan 2017, 7:56 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul gandhi take a jibe again on pm modi and bjps ideology
भाजप आणि मोदींवर राहुल यांचे व्यंग


काँग्रेसच्या जनवेदना संमेलनातून पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यंग करत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विचारधारेवर हल्ला केला. भाजपची विचारधारा भीती निर्माण करणारी आहे. तर भीती दूर करण्याचे काँग्रेसचे काम आहे, अशी टीका राहुल यांनी केली. तसंच 'घाबरू नका' असा नारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

लोकसभा निवडणुकीवेळी भाजप आणि पंतप्रधान मोदींनी देलेल्या 'काँग्रेस मुक्त भारत' च्या नाऱ्याला राहुल यांनी उत्तर दिले. 'ते कामय नवीन भारत बनवण्याची भाषा करतात. एकच व्यक्ती कसा भारत बनवेल? बाकी सगळे मूर्ख आहेत. फक्त नरेंद्र मोदीच सर्वकाही चांगलं करू शकतात? या देशाने ब्रिटिशांची हकालपट्टी केली आहे. हा देश हुशार आहे', असं राहुल गांधी म्हणाले.

Jaise dialogue hote hain, waise hi PM ne kiya aur kaha "Mitron, ye jo jeb mein 500, 1000 ka note hai ab ye kaagaz ho gaya hai kaagaz": RG pic.twitter.com/cyH40MmkOX — ANI (@ANI_news) January 11, 2017

'भीती निर्माण करणे ही भाजपची विचारधारा आहे. भीती घालून सत्तेवर राहण्याचा त्यांचा विचार आहे. नोटबंदी, दहशतवाद आणि नक्षलवादावरून भाजपने भीती पसरवली आहे. 'घाबरवा' असे भाजपचे धोरण आहे. देशाला घाबरवण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. तर 'घाबरू नका' ही काँग्रेसची विचारधारा आहे. अडचणीच्या स्थितीत याचा सामना करा. देशाच्या कुठल्याही नागरिकाला घाबरण्याची गरज नाही', असं राहुल गांधी म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज