अ‍ॅपशहर

india covid crisis : 'मदतीचा हात पुढे करा अन् अंधळ्या यंत्रणेचं सत्य दाखवत चला'

देशात करोना रुग्णांची झपाट्याने वाढत आहे. गेल्या ११ दिवसांपासून देशात अडीच लाखांहून अधिक करोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. यावरून राहुलगांधी यांनी केंद्र सरकारला टीकेचं लक्ष्य केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Apr 2021, 7:43 pm
नवी दिल्लीः देशातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या मुद्द्यावरून काँग्रेचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (rahul gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशाची यंत्रणा अंधळी असल्याचं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rahul gandhi
'मदतीचा हात पुढे करा अन् अंधळ्या यंत्रणेचं सत्य दाखवत चला'


सामान्य जनता एकमेकांची मदत करताना दिसून येत आहे. एखाद्याची मदत करताना मन जिंकण्यासाठी त्याचा हात पकडण्याची गरज नाही, असं राहुल गांधी या ट्वीटमध्ये म्हणाले.

याआधी राहुल गांधी कोविड हॉस्पिटल्समधील परिस्थितीवरून मोदी सरकारला टीकेचं लक्ष्य केलं. देशात सर्वांना मोफत लस देण्याची गरज आहे. पण सरकार अशा परिस्थितीतही सेंट्रल विस्ता प्रोजेक्टचे काम सुरू ठेवले आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

गुड न्यूज! सीरमने लसची किंमत १०० रुपयांनी कमी केली, पुनावालांची माहिती

करोनाचा प्रादुर्भाव देशात सतत वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार देशात ३ लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. देशात गेल्या ११ दिवसांपासून अडीच लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत.

Covid19: मैत्रीच्या 'ऑक्सिजन'ची गोष्टच न्यारी! १४०० किमी प्रवास आणि धावाधाव...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज