अ‍ॅपशहर

रेल्वे अर्थसंकल्पाचे अस्तित्व संपणार सप्टेंबरमध्ये

रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा बंद करायचे सरकारने ठरवले असून याबाबत अंतिम निर्णय पुढील महिन्यात घेतला जाणार आहे.

Maharashtra Times 26 Aug 2016, 12:10 pm
नवी दिल्ली : रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याची प्रथा बंद करायचे सरकारने ठरवले असून याबाबत अंतिम निर्णय पुढील महिन्यात घेतला जाणार आहे. रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प १९२४पासून सादर केला जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प एकत्र करण्याच्या सर्व शक्यता सध्या अर्थसंकल्प विभागातील संयुक्त कृतीगट चाचपून पहात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम railway budget
रेल्वे अर्थसंकल्पाचे अस्तित्व संपणार सप्टेंबरमध्ये


रेल्वे अर्थसंकल्प व केंद्रीय अर्थसंकल्प यांचे एकत्रिकरण करण्यास यापूर्वीच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मान्यता दिली आहे. यानुसार, पुढील आर्थिक वर्षापासून दोन अर्थसंकल्पांऐवजी एकच सर्वसमावेशक केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होणार आहे. रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पात विलिन करावा, अशी विनंती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीच अरुण जेटली यांना केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज