नवी दिल्ली : लॉकडाऊनपासून देशातील विमान आणि रेल्वेसेवाही बंद आहे. १४ एप्रिलपर्यंत हे लॉकडाऊन राहणार आहे. १५ एप्रिलपासून प्रवासी रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याची तयारी केली जात असल्याची माहिती पीटीआयला सूत्रांनी दिली आहे. १५ एप्रिलपासून प्रवासी रेल्वे पुन्हा रुळावर आणण्याची तयारी सुरू झालं असल्याचं बोललं जात आहे. सध्या फक्त मालगाड्यांचीच वाहतूक रेल्वेच्या वतीने सुरू असून प्रवासी रेल्वे पूर्णपणे बंद आहे.
दिवे लावून करोना गेला तर चांगलंच आहे: राज ठाकरे
एअर इंडियाची बुकिंग ३० एप्रिलपर्यंत बंद
रेल्वेसोबतच विमानसेवाही सध्या बंद आहे. लॉकडाऊन पुन्हा वाढणार की संपणार याबाबत कोणतीही निश्चित माहिती नाही. त्यामुळे एअर इंडियाने ३० एप्रिलपर्यंत बुकिंग सुविधा बंद केली आहे. १४ एप्रिलनंतरच्या निर्णयाची आम्हाला प्रतिक्षा असल्याचं एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितलं. विमानवाहक कंपन्या १४ एप्रिलनंतरची बुकिंग सुरू करू शकतात, असं नुकतंच नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव प्रदीप सिंह खरोला यांनी म्हटलं होतं. २५ मार्च रोजी सुरू झालेलं लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार आहे.
...तर राज्य व देश अंधारात जाण्याची भीती!
करोनाबाधितांची संख्या वाढतीच
देशात शुक्रवारी एकूण १६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. एका दिवसातील हा मृतांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. एकूण करोनाबाधितांची संख्या आता ३००० च्या जवळ पोहोचली असून एकूण २९०२ रुग्ण झाले आहेत. देशात शुक्रवारीही ५०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. गुरुवारीही ५०० पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले होते. आतापर्यंत ६८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही करोनाचा धुमाकूळ सुरुच आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात ६ जणांचा मृत्यू झाला असून एकूण आकडा २६ वर पोहोचला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४९० झाली आहे, ज्यात एकट्या मुंबईतच २७८ रुग्ण आहेत. ३० मार्च रोजी महाराष्ट्रात २२० रुग्ण होते, हा आकडा चार दिवसातच दुप्पट झाला आहे.
दिवे लावून करोना गेला तर चांगलंच आहे: राज ठाकरे
एअर इंडियाची बुकिंग ३० एप्रिलपर्यंत बंद
रेल्वेसोबतच विमानसेवाही सध्या बंद आहे. लॉकडाऊन पुन्हा वाढणार की संपणार याबाबत कोणतीही निश्चित माहिती नाही. त्यामुळे एअर इंडियाने ३० एप्रिलपर्यंत बुकिंग सुविधा बंद केली आहे. १४ एप्रिलनंतरच्या निर्णयाची आम्हाला प्रतिक्षा असल्याचं एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितलं. विमानवाहक कंपन्या १४ एप्रिलनंतरची बुकिंग सुरू करू शकतात, असं नुकतंच नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव प्रदीप सिंह खरोला यांनी म्हटलं होतं. २५ मार्च रोजी सुरू झालेलं लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार आहे.
...तर राज्य व देश अंधारात जाण्याची भीती!
करोनाबाधितांची संख्या वाढतीच
देशात शुक्रवारी एकूण १६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. एका दिवसातील हा मृतांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. एकूण करोनाबाधितांची संख्या आता ३००० च्या जवळ पोहोचली असून एकूण २९०२ रुग्ण झाले आहेत. देशात शुक्रवारीही ५०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. गुरुवारीही ५०० पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळले होते. आतापर्यंत ६८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही करोनाचा धुमाकूळ सुरुच आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात ६ जणांचा मृत्यू झाला असून एकूण आकडा २६ वर पोहोचला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४९० झाली आहे, ज्यात एकट्या मुंबईतच २७८ रुग्ण आहेत. ३० मार्च रोजी महाराष्ट्रात २२० रुग्ण होते, हा आकडा चार दिवसातच दुप्पट झाला आहे.