अ‍ॅपशहर

भारतात घटतेय पावसाळी ढगांची संख्या

मान्सूनमध्ये कमी उंचीवर उडणारे ढगच पाऊस आणतात. मात्र गेल्या काही वर्षांत या पावसाळी ढगांचे आकारमान कमी झाले असून त्यांची संख्याही घटली आहे. भारतीय हवामान विभागाने गेल्या ५० वर्षांतील आकड्यांच्या अभ्यास करून तयार केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

Subodh Varma | Maharashtra Times 15 Jun 2017, 2:18 pm
नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rain clouds thinning out in west and central india
भारतात घटतेय पावसाळी ढगांची संख्या


मान्सूनमध्ये कमी उंचीवर उडणारे ढगच पाऊस आणतात. मात्र गेल्या काही वर्षांत या पावसाळी ढगांचे आकारमान कमी झाले असून त्यांची संख्याही घटली आहे. भारतीय हवामान विभागाने गेल्या ५० वर्षांतील आकड्यांच्या अभ्यास करून तयार केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. याचाच अर्थ, आगामी काळात कमी पाऊस पडणार असून तापमान वाढणार आहे. तसेच दिवस व रात्रीच्या तापमानातही बदल होणार आहे.

भारतात होणाऱ्या एकूण पावसापैकी ७० टक्के पाऊस मान्सूनच्या काळात होतो. पंजाबपासून बिहारपर्यंत पसरलेल्या उत्तरी भागात कमी उंचीवरील ढगांच्या संख्येत दरवर्षी ४ ते ८ टक्के वाढ होताना दिसते, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर पश्चिम तट आणि मध्य भारतात या ढगांची संख्या दरवर्षी ४ ते ६ टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच या भागात कमी पाऊस पडेल तसेच येथील तापमानातही वाढ होईल.

भारतीय हवामान विभागातील ए.के.जयस्वाल, पी.ए.कोरे आणि वीरेंद्र सिंह यांनी हा अहवाल तयार केला आहे. मात्र या ढगांची संख्या कमी होण्यामागचे नेमके कारण त्यामध्ये नमूद केलेलं नसल तरी वातावरणातील धूळ आणि धूर वाढल्यामुळे हा प्रकार घडत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. देशातील अर्ध्याहून अधिक शेती ही पावसावर अवलंबून असल्यामुळे हा अहवाल चिंताजनक ठरतो. कमी वा जास्त पावसामुळे शेतीवर, पर्यायाने अर्थव्यवस्थेही परिणाम होतो.
लेखकाबद्दल
Subodh Varma

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज