नवी दिल्ली : 'सध्याच्या आर्थिक परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार आहे. सरकारला राजकारण आणि सोशल अजेंडे राबवण्यात अधिक रस असून त्यांना अर्थव्यवस्थेचे घेणेदेणे नाही,' अशी घणाघाती टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजन यांनी विकासदर घसरल्याबाबत केंद्र सरकारच्या दिशाहीन कारभारावर टीका केली. 'सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस यश मिळवल्यानंतर केंद्र सरकार त्यांच्या राजकीय अजेंड्याला महत्व देत आहे. अर्थव्यवस्थेच्या समस्या सोडवण्याऐवजी सरकारने त्यांच्या सोशल अजेंड्याला प्राधान्य दिल्यानेच अर्थव्यवस्थेची अशी दुर्दशा झाली आहे,' असे राजन म्हणाले.
राजन यांची टीका
'सध्याच्या आर्थिक परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2020, 4:00 am