अ‍ॅपशहर

'तारीख निश्चित होताच राजस्थानमध्ये आमदारांचा रेट अनलिमिटेड झाला'

राजस्थानचे मुख्यमंत्री यांनी १४ ऑगस्टपासून विधिमंडळाचं अधिवेशन बोलावलं आहे. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असल्याने मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे. त्यातच आज मुख्यमंत्री गहलोत यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jul 2020, 11:29 pm
जयपूर: राजस्थानमधील राजकीय उलथापालथ थांबलेली नाही. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'सरकारला पाडण्याचा संपूर्ण खेळ भाजपाने तयार केला आहे. जनता त्यांच्या नेत्यांना क्षमा करणार नाही', असं गहलोत म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम तारीख निश्चित होताच राजस्थानमध्ये आमदारांचा रेट अनलिमिटेड झाला


त्याचवेळी सीएम गहलोत यांनी आपल्या पक्षाच्या बंडखोर आमदारांकडे लक्ष वेधले. जर कोणाला राग आला असेल तर त्यांनी पक्षाची हाय कमांड AICC शी चर्चा करावी किंवा राज्य कॉंग्रेस समितीकडे यावे. तुम्ही सर्व कॉंग्रेसच्या निशाणीवर निवडून आला आहात. यामुळे तुम्ही सरकारसोबत यावं, असं आवाहन गहलोत यांनी केलं.

विधानसभा अधिवेशनाची तारीख निश्चित झाल्यानंतर आमदारांच्या घोडेबाजारातील रेट वाढला आहे. हा रेट अनलिमिटेड झाला आहे. ज्यांनी पहिला हप्ता घेतलेला नाही त्यांनी परत यावं. भाजप नेते लपून छपून दिल्लीला जात आहे. देव त्यांना सद्बुद्धी देवो, असं गहलोत म्हणाले.

विधानसभेसाठी १४ तारख निश्चित होताच आमदारांचा पहिला हप्ता १० होता. दुसरा हप्ता १५ होता. हे जाणून चकित व्हाल, आता ते अनलिमिटेड झाले आहे. काय हवं तुम्हाला? तुम्हीच सांगा असं आता आमदारांना विचारलं जात आहे. याचा अर्थ असा की घोडे व्यापाराचा रेट २५ वरून वाढला आहे. याचे मॉनिटरिंग कोण करतंय हे सर्वांनाच ठाऊक आहे, असा आरोप गहलोत यांनी सचिन पायलट यांचे नाव न घेता केला.

सरकार पाडण्याच्या या षडयंत्रात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांचे नाव समो आले आहे. परंतु अद्याप त्यांनी राजीनामा दिलेला नाही. कॉंग्रेसच्या राज्यात असं काम करणारे मंत्री राजीनामा देत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपण संपूर्ण घटनाक्रमाची माहिती करून दिली आहे, असं गहलोत यांनी सांगितलं.

भ्रष्टाचार प्रकरणी जया जेटलींना मोठा दिलासा, हायकोर्टाने निलंबित केली ४ वर्षांची शिक्षा

प्रियांका गांधींनी सरकारी बंगला खाली केला; लखनऊत नाही, तर इथे राहणार!

अधिवेशनात काय होईल ते सल्लागार समिती ठरवेल. बसपाच्या आमदारांविषयीही गहलोत यांनी मायावतींचा आरोप फेटाळून लावला. काहीही परिस्थइती निर्माण होऊ दे आपण ताणतणावात राहत नाही. आपल्यावर देवाची कृपा आहे. परिस्थिती काहीही असो आपण सत्यतेनेच वागतो, असं मुख्यंमत्री अशोक गहलोत म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज