जयपूर: देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे करोनाची तिसरी लाट येईल अशी भीती व्यक्त करण्यात येत असतानाच रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ दिसू लागल्याने सर्वच यंत्रणा हादरल्या आहेत. त्यात राजस्थानात आज एकाच दिवशी तब्बल २१ नवे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ४३ झाली आहे. दरम्यान, ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत आसाममध्येही उद्यापासून नाइट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ( Omicron In Rajasthan Latest Breaking News ) वाचा: महाराष्ट्रासह १० राज्यांनी चिंता वाढवली; केंद्राने घेतला 'हा' मोठा निर्णय
राजस्थानच्या आरोग्य विभागाकडून आज ओमिक्रॉनबाबत अपडेट्स देण्यात आले. आरोग्य विभागाकडून पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ( एनआयव्ही ) येथे नमुने पाठवण्यात आले होते. त्यातील २१ जणांना ओमिक्रॉनची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात जयपूरमधील ११, अजमेरमधील ६, उदयपूरमधील ३ व महाराष्ट्रातील एका व्यक्तीचा समावेश आहे. यापैकी ५ रुग्ण विदेशातून परतलेले असल्याचे सांगण्यात आले. एकाच दिवशी २१ नवे रुग्ण आढळल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ४३ झाली आहे.
वाचा: 'या' राज्याचे सर्वात मोठे पाऊल; नाइट कर्फ्यू आणि १ जानेवारीपासून...
दरम्यान, देशातील ओमिक्रॉन बाधितांचा आकडा आता साडेचारशेच्या जवळ पोहचला आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक १०८ रुग्ण आढळले आहेत तर त्यानंतर दिल्लीत रग्णसंख्या ७९ वर पोहचली आहे. रुग्णसंख्येतील ही वाढ राज्य आणि केंद्र सरकारसाठी चिंता वाढवणारी ठरली आहे.
आसाममध्येही नाइट कर्फ्यूचे आदेश
ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत केंद्राच्या निर्देशानंतर अनेक राज्यांनी नाइट कर्फ्यू व अन्य प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. महाराष्ट्र , उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणानंतर आज आसामनेही नाइट कर्फ्यूचा निर्णय घेतला. राज्यात उद्यापासून नाइट कर्फ्यू लागू केला जाणार आहे. रात्री ११.३० ते सकाळी ६ अशी कर्फ्यूची वेळ असणार आहे. ३१ डिसेंबरला मात्र नाइट कर्फ्यू नसेल असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
वाचा: ओमिक्रॉनला रोखण्यासाठी वेगवान पावले; PM मोदींनी दिला पहिला अलर्ट!
राजस्थानच्या आरोग्य विभागाकडून आज ओमिक्रॉनबाबत अपडेट्स देण्यात आले. आरोग्य विभागाकडून पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था ( एनआयव्ही ) येथे नमुने पाठवण्यात आले होते. त्यातील २१ जणांना ओमिक्रॉनची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात जयपूरमधील ११, अजमेरमधील ६, उदयपूरमधील ३ व महाराष्ट्रातील एका व्यक्तीचा समावेश आहे. यापैकी ५ रुग्ण विदेशातून परतलेले असल्याचे सांगण्यात आले. एकाच दिवशी २१ नवे रुग्ण आढळल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता ४३ झाली आहे.
वाचा: 'या' राज्याचे सर्वात मोठे पाऊल; नाइट कर्फ्यू आणि १ जानेवारीपासून...
दरम्यान, देशातील ओमिक्रॉन बाधितांचा आकडा आता साडेचारशेच्या जवळ पोहचला आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सर्वाधिक १०८ रुग्ण आढळले आहेत तर त्यानंतर दिल्लीत रग्णसंख्या ७९ वर पोहचली आहे. रुग्णसंख्येतील ही वाढ राज्य आणि केंद्र सरकारसाठी चिंता वाढवणारी ठरली आहे.
आसाममध्येही नाइट कर्फ्यूचे आदेश
ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत केंद्राच्या निर्देशानंतर अनेक राज्यांनी नाइट कर्फ्यू व अन्य प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. महाराष्ट्र , उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणानंतर आज आसामनेही नाइट कर्फ्यूचा निर्णय घेतला. राज्यात उद्यापासून नाइट कर्फ्यू लागू केला जाणार आहे. रात्री ११.३० ते सकाळी ६ अशी कर्फ्यूची वेळ असणार आहे. ३१ डिसेंबरला मात्र नाइट कर्फ्यू नसेल असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
वाचा: ओमिक्रॉनला रोखण्यासाठी वेगवान पावले; PM मोदींनी दिला पहिला अलर्ट!