चेन्नई:
सत्तेत असलेला कोणताही पक्ष विरोधकांसाठी धोकादायक असतो. त्याच न्यायाने भाजप विरोधकांसाठी धोकादायक पक्ष आहे असं प्रतिपादन सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं आहे. मात्र भाजप लोकांसाठी धोकादायक आहे की नाही याचा निर्णय त्यांनी सामान्यांवर सोडला आहे.
सोमवारी भाजपबद्दल मत विचारलं असताना, ' जर विरोधकांना भाजप धोकादायक वाटतो तर तो असेलही' असं उत्तर रजनीकांत यांनी दिलं होतं. या विधानामुळे बरीच खळबळ माजली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना भाजप विरोधकांसाठी धोकादायक पक्ष आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.'जर दहा जण एकाच व्यक्तीवर एकत्रितपणे तुटून पडत असतील तर तो निश्चितच शक्तीशाली असणार' असं मत रजनीकांतने व्यक्त केलं. आता या विधानातील एक व्यक्ती म्हणजे खुद्द पंतप्रधान मोदी की भाजप कसा धोकादायक आहे हे समजवणारं हे उदाहरण होतं हे मात्र गुलदस्त्यात आहे.
मला राजकीय विधानं करायची नाहीत
'मी अजूनही राजकारणात पूर्णपणे शिरलेलो नाही. त्यामुळे राजकारणाबद्दल मला कोणतंही विधान करायचं नाही आहे.' अशी सावध भूमिका सध्या रजनीकांत यांनी घेतली आहे. २०१९ लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
सत्तेत असलेला कोणताही पक्ष विरोधकांसाठी धोकादायक असतो. त्याच न्यायाने भाजप विरोधकांसाठी धोकादायक पक्ष आहे असं प्रतिपादन सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं आहे. मात्र भाजप लोकांसाठी धोकादायक आहे की नाही याचा निर्णय त्यांनी सामान्यांवर सोडला आहे.
सोमवारी भाजपबद्दल मत विचारलं असताना, ' जर विरोधकांना भाजप धोकादायक वाटतो तर तो असेलही' असं उत्तर रजनीकांत यांनी दिलं होतं. या विधानामुळे बरीच खळबळ माजली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना भाजप विरोधकांसाठी धोकादायक पक्ष आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.'जर दहा जण एकाच व्यक्तीवर एकत्रितपणे तुटून पडत असतील तर तो निश्चितच शक्तीशाली असणार' असं मत रजनीकांतने व्यक्त केलं. आता या विधानातील एक व्यक्ती म्हणजे खुद्द पंतप्रधान मोदी की भाजप कसा धोकादायक आहे हे समजवणारं हे उदाहरण होतं हे मात्र गुलदस्त्यात आहे.
मला राजकीय विधानं करायची नाहीत
'मी अजूनही राजकारणात पूर्णपणे शिरलेलो नाही. त्यामुळे राजकारणाबद्दल मला कोणतंही विधान करायचं नाही आहे.' अशी सावध भूमिका सध्या रजनीकांत यांनी घेतली आहे. २०१९ लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.