अ‍ॅपशहर

...तर आम्ही गोळ्या मोजणार नाही!- राजनाथ

भारताने कधीही स्वतःहून कुठल्याही देशावर हल्ला केलेला नाही. पण देशावर हल्ला झाल्यास आम्ही गोळ्या मोजत नाही, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. राजस्थानमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर ते बीएसएफ जवानांशी बोलत होते.

Maharashtra Times 9 Oct 2016, 9:05 am
मटा ऑनलाइन वृत्त । बाडमेर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajnath says india will not count the bullets if attacked
...तर आम्ही गोळ्या मोजणार नाही!- राजनाथ


भारताने कधीही स्वतःहून कुठल्याही देशावर हल्ला केलेला नाही. पण देशावर हल्ला झाल्यास आम्ही गोळ्या मोजत नाही, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. राजस्थानमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर ते बीएसएफ जवानांशी बोलत होते.

'वसुधैव कुटुंबकम्' ही भारताची संस्कृती आहे. त्यामुळे कुणाची जमीन बळकावण्याची आमची अजिबात इच्छा नाही. म्हणूनच भारताने कधीही कुणावर स्वतःहून हल्ला केलेला नाही. आम्ही गोळीबाराला सुरुवात करत नाही, पण पलीकडून हल्ला झाला तर मात्र आम्ही गोळ्या मोजत नाही, असं राजनाथ सिंह यांनी निक्षून सांगितलं. त्यातून त्यांनी जवानांची आत्मविश्वास वाढवलाच, पण पाकलाही दटावलं.

उरी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'नंतर भारत-पाकिस्तानवर युद्धाचे ढगच दाटले आहेत. पाकिस्तानकडून सर्जिकल स्ट्राइकचा बदला घेतला जाऊ शकतो, असा दाट संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. त्यामुळेच देशभरात हाय अॅलर्ट देण्यात आला आहे. सोबतच, केंद्र सरकारही सुरक्षेतील त्रुटी शोधून त्या दूर करण्याच्या कामाला लागलंय. त्याचाच भाग म्हणून राजनाथ राजस्थान दौऱ्यावर आहेत.

आंतरराष्ट्रीय सीमारेषांच्या जवळ नवे मोबाइल टॉवर उभारून संपर्क यंत्रणा आणखी बळकट केली जाईल, सॅटेलाइट फोनची संख्याही वाढवण्यात येईल आणि कमी वजनाची बुलेटप्रूफ जॅकेटही लवकरात लवकर पुरवली जातील, असं आश्वासन राजनाथ यांनी बीएसएफ जवानांना दिलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज