म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालून दलित, आदिवासी आणि ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यापासून हेतुपुरस्सर वंचित ठेवणाऱ्या हरयाणा आणि राजस्थानच्या कायद्यांवर खेद व्यक्त करणारा प्रस्ताव संमत करून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी बुधवारी राज्यसभेत मोदी सरकारला सलग दुसऱ्या वर्षी अडचणीत आणले. राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभार व्यक्त करणाऱ्या मोदी सरकारच्या प्रस्तावात काँग्रेसने दुरुस्ती सुचविली आणि रालोआचा विरोध मोडून काढत ९४ विरुद्ध ५१ अशा मतांनी संमत करून घेतली.
काही राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये किमान शैक्षणिक पात्रतेच्या नावाखाली अनुसूचित जाती व जमातीच्या महिलांना त्यांच्या घटनादत्त अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असून, ही तरतूद तत्काळ संपुष्टात आणावी, अशी मागणी मंगळवारी जागतिक महिला दिनानिमित्त सोनिया गांधी यांनी लोकसभेत केली होती. त्यांच्या मागणीचे राज्यसभेत दुरुस्ती प्रस्तावात रूपांतर करीत बुधवारी काँग्रेसने मोदी सरकारचा आभारप्रस्ताव फेटाळून लावला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात विरोधकांनी ३०० दुरुस्त्या सुचविल्या होत्या. विरोधकांनी आपल्या दुरुस्त्या मागे घ्याव्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पण विरोधक बधणार नाही, याची त्यांनाही कल्पना होती. त्यामुळे विरोधकांवर टीका करीत मतदानापूर्वीच मोदी सभागृहातून निघून गेले.
किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालून दलित, आदिवासी आणि ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यापासून हेतुपुरस्सर वंचित ठेवणाऱ्या हरयाणा आणि राजस्थानच्या कायद्यांवर खेद व्यक्त करणारा प्रस्ताव संमत करून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांनी बुधवारी राज्यसभेत मोदी सरकारला सलग दुसऱ्या वर्षी अडचणीत आणले. राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभार व्यक्त करणाऱ्या मोदी सरकारच्या प्रस्तावात काँग्रेसने दुरुस्ती सुचविली आणि रालोआचा विरोध मोडून काढत ९४ विरुद्ध ५१ अशा मतांनी संमत करून घेतली.
काही राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये किमान शैक्षणिक पात्रतेच्या नावाखाली अनुसूचित जाती व जमातीच्या महिलांना त्यांच्या घटनादत्त अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असून, ही तरतूद तत्काळ संपुष्टात आणावी, अशी मागणी मंगळवारी जागतिक महिला दिनानिमित्त सोनिया गांधी यांनी लोकसभेत केली होती. त्यांच्या मागणीचे राज्यसभेत दुरुस्ती प्रस्तावात रूपांतर करीत बुधवारी काँग्रेसने मोदी सरकारचा आभारप्रस्ताव फेटाळून लावला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात विरोधकांनी ३०० दुरुस्त्या सुचविल्या होत्या. विरोधकांनी आपल्या दुरुस्त्या मागे घ्याव्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पण विरोधक बधणार नाही, याची त्यांनाही कल्पना होती. त्यामुळे विरोधकांवर टीका करीत मतदानापूर्वीच मोदी सभागृहातून निघून गेले.