मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
देशातील १७ बँकांकडून तब्बल ९ हजार कोटींचं कर्ज घेऊन विदेशात जाऊन बसलेल्या विजय मल्ल्याचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा उपराष्ट्रपती तसेच राज्यसभा सभापती हमीद अन्सारी यांनी फेटाळला आहे. मल्ल्याने पाठवलेल्या राजीनामा पत्रावर मूळ स्वाक्षरी नाही तसेच आवश्यक प्रक्रियेनुसार हा राजीनामा पाठवण्यात आलेला नाही, असे नमूद करत राज्यसभा सभापतींनी मल्ल्याचा राजीनामा फेटाळला आहे.
राज्यसभेचे महासचिव समशेर के. शेरीफ यांनी मल्ल्याच्या राजीनाम्याला उत्तर दिलं असून त्यात राज्यसभेच्या नियम क्र. २१३ चा हवाला देत राजीनाम्यावर आक्षेप घेण्यात आले आहेत. या नियमानुसार सभागृहाच्या सदस्याचा राजीनामा स्वेच्छेने केलेला आणि वास्तववादी असणं आवश्यक आहे, असं मतही या उत्तरात नोंदवण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या शिस्तपालन समितीने आधीच मल्ल्याचा राजीनामा नाकारताना त्याचं राज्यसभा सदस्यत्व बडतर्फ करण्याची शिफारस केली आहे. या पार्श्वभूमीवर आता सभापतींनी मल्ल्याचा राजीनामा फेटाळल्याने मल्ल्यावर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे. मल्ल्याची राज्यसभेतून हकालपट्टी झाल्यास शिस्तभंगामुळे झालेली अशाप्रकारची ही पंधरावी कारवाई ठरणार आहे. राज्यसभेच्या इतिहासात आतापर्यंत अशाप्रकारे १४ खासदारांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे.
देशातील १७ बँकांकडून तब्बल ९ हजार कोटींचं कर्ज घेऊन विदेशात जाऊन बसलेल्या विजय मल्ल्याचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा उपराष्ट्रपती तसेच राज्यसभा सभापती हमीद अन्सारी यांनी फेटाळला आहे. मल्ल्याने पाठवलेल्या राजीनामा पत्रावर मूळ स्वाक्षरी नाही तसेच आवश्यक प्रक्रियेनुसार हा राजीनामा पाठवण्यात आलेला नाही, असे नमूद करत राज्यसभा सभापतींनी मल्ल्याचा राजीनामा फेटाळला आहे.
राज्यसभेचे महासचिव समशेर के. शेरीफ यांनी मल्ल्याच्या राजीनाम्याला उत्तर दिलं असून त्यात राज्यसभेच्या नियम क्र. २१३ चा हवाला देत राजीनाम्यावर आक्षेप घेण्यात आले आहेत. या नियमानुसार सभागृहाच्या सदस्याचा राजीनामा स्वेच्छेने केलेला आणि वास्तववादी असणं आवश्यक आहे, असं मतही या उत्तरात नोंदवण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्यसभेच्या शिस्तपालन समितीने आधीच मल्ल्याचा राजीनामा नाकारताना त्याचं राज्यसभा सदस्यत्व बडतर्फ करण्याची शिफारस केली आहे. या पार्श्वभूमीवर आता सभापतींनी मल्ल्याचा राजीनामा फेटाळल्याने मल्ल्यावर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे. मल्ल्याची राज्यसभेतून हकालपट्टी झाल्यास शिस्तभंगामुळे झालेली अशाप्रकारची ही पंधरावी कारवाई ठरणार आहे. राज्यसभेच्या इतिहासात आतापर्यंत अशाप्रकारे १४ खासदारांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे.