अ‍ॅपशहर

tribute to lata mangeshkar : संसदही झाली भावुक! लतादीदींना श्रद्धांजली वाहत उपराष्ट्रपती म्हणाले...

लतादीदींच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला आहे. केंद्र सरकारने रविवारी दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. तर, संसद अधिवेशनात आज राज्यसभेत कामकाज सुरू होण्यापूर्वी लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यात आली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Feb 2022, 11:04 am
नवी दिल्ली : भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचं कामकाज आज सुरू होताच राज्यसभेत लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यसभेत १ मिनिटं मौन राखत राज्यसभेचे सभातील व्यंकय्या नायडू आणि सभागृहातील सर्व सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajya sabha pays tribute to the legendary singer lata mangeshkar
संसदही झाली भावुक! लतादीदींना श्रद्धांजली वाहत उपराष्ट्रपती म्हणाले...


उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू म्हणाले...

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने देशाने एका महान पार्श्वगायिकेला आणि एका उमद्या व्यक्तिमत्वाला गमावले आहे. यामुळे जागतिक स्तरावरील भारतीय संगीत आणि चित्रपट क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. लतादीदींच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असं सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले.

यानंतर राज्यसभेत सभापती नायडू यांनी १ मिनिट मौन राखून सभागृहाच्या वतीने सर्व सदस्यांना श्रद्धांजली वाहण्याचं आवाहन केलं. राज्यसभेतील सर्व सदस्यांनी १ मिनिट उभं राहून मौन राखत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. यानंतर राज्यसभेचं कामकाज ११ वाजेपर्यंत म्हणजे १ तासासाठी तहकूब केलं.

lata mangeshkar : लतादीदींच्या निधनानंतर भाजपचा मोठा निर्णय; श्रद्धांजली वाहत PM मोदी म्हणाले...

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लतादीदींच्या स्मरणार्थ भोपाळमध्ये वृक्षारोपण केलं. लतादीदींचा जन्म इंदूरमध्ये झाला. आता लतादीदींच्या स्मृतीत इंदूरमध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात येईल. यासोबतच संगीत अकादमी, संगीत विद्यापीठ आणि संग्रहालयही उभारले जाईल. लतादीदींच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारकडून दरवर्षी 'लता मंगेशकर पुरस्कार' देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.

पाकविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या विजयासाठी लतादीदींनी अन्न, पाणी न घेता केला होता उपवास

महत्वाचे लेख