अयोध्या: मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांनी कधीच कुणावर अन्याय केला नाही आणि कधी अन्याय सहनही केला नाही. अधर्म करणार नाही आणि अधर्म होऊ देणार नाही, असाच त्यांचा पण राहिला. अयोध्या ही सूर्यवंशाची राजधानी आहे आणि अयोध्येतूनच प्रभू श्रीरामांनी संपूर्ण मानवतेसाठी एक सर्वोत्तम असा आदर्श स्थापित केला, अशा शब्दांत अयोध्या आणि प्रभू श्रीरामांचे वर्णन करतानाच राम आणि धर्म हे वेगळे होऊच शकत नाहीत. दोन्ही एकमेकाला पूरक आहेत, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. ( Yogi Adityanath On Ram And Religion ) वाचा:युरोपमधून आलेल्या ४ प्रवाशांना करोना; 'ही' धक्कादायक माहिती आली समोर
महर्षी वेद विद्यापीठ येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथ अयोध्या येथे आले होते. यावेळी बोलताना प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना योगी यांनी फटकारले व प्रत्येक भारतीयाला प्रभू राम आणि अयोध्येबाबत अभिमान असल्याचे सांगितले. अयोध्येने ५०० वर्षे इतका प्रदीर्घ काळ संघर्ष पाहिला आहे. वेळोवेळी आक्रमणं होत राहिली मात्र अयोध्या डगमगली नाही, स्वस्थ बसली नाही. अयोध्येने कधीच अन्याय-अत्याचार सहन केला नाही. हीच अयोध्येची महानता आहे, असे योगी म्हणाले.
वाचा:महाराष्ट्रावर घोंगावतंय ओमिक्रॉनचं संकट; आफ्रिकेतून आलेले 'ते' सहा प्रवासी...
योगींनी काँग्रेस वा अन्य पक्षांचा उल्लेख न करता निशाणा साधला. आधीची सरकारं धर्मनिरपेक्ष असल्याचं केवळ ढोंग करत राहिली. भारत आणि भारतीयत्व याकडे पाठ फिरवली गेली. अशावेळी महर्षी महेश योगी यांनी भारताची खरी ओळख अवघ्या जगाला करून दिली. जागतिक मंचावर आपले विचार परखडपणे मांडले. त्यांचे कार्य अतुलनीय असेच होते, असे आदित्यनाथ म्हणाले. वेदांबाबत अपप्रचार केला गेला. जगासमोर चुकीच्या पद्धतीने त्याची मांडणी केली गेली. असे असताना महेश योगी यांनी ही चूक सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले. भारत, भारतीयत्व, वेदांचं महत्त्व, रामायण, महाभारत याची माहिती प्रभावीपणे त्यांनी मांडली आणि त्याचा प्रसार केला, असे गौरवोद्गारही योगींनी काढले. धर्म सुधारणा निरंतर ही प्रक्रिया आहे. प्रत्येक कालखंडात ही प्रक्रिया चालली पाहिजे. ज्यामुळे समाज कमकुवत होऊ शकतो अशा गोष्टींची डागडुजी व्हायला हवी. तसे झाले नाही तर राष्ट्र कमकुवत होईल, असे महत्त्वाचे विधानही योगींनी केले.
दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकांचे पडघम वाजत असताना अयोध्या आणि राम मंदिर केंद्रस्थानी असणार हे निश्चितच आहे. त्यामुळेच अयोध्येत नेत्यांचे दौरे वाढू लागले असून योगींचा हा दौराही त्यामुळेच चर्चेत राहिला.
वाचा:ओमिक्रॉनवर कोव्हिशील्ड किती प्रभावी?; पूनावाला यांनी दिली आनंदाची बातमी
महर्षी वेद विद्यापीठ येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथ अयोध्या येथे आले होते. यावेळी बोलताना प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना योगी यांनी फटकारले व प्रत्येक भारतीयाला प्रभू राम आणि अयोध्येबाबत अभिमान असल्याचे सांगितले. अयोध्येने ५०० वर्षे इतका प्रदीर्घ काळ संघर्ष पाहिला आहे. वेळोवेळी आक्रमणं होत राहिली मात्र अयोध्या डगमगली नाही, स्वस्थ बसली नाही. अयोध्येने कधीच अन्याय-अत्याचार सहन केला नाही. हीच अयोध्येची महानता आहे, असे योगी म्हणाले.
वाचा:महाराष्ट्रावर घोंगावतंय ओमिक्रॉनचं संकट; आफ्रिकेतून आलेले 'ते' सहा प्रवासी...
योगींनी काँग्रेस वा अन्य पक्षांचा उल्लेख न करता निशाणा साधला. आधीची सरकारं धर्मनिरपेक्ष असल्याचं केवळ ढोंग करत राहिली. भारत आणि भारतीयत्व याकडे पाठ फिरवली गेली. अशावेळी महर्षी महेश योगी यांनी भारताची खरी ओळख अवघ्या जगाला करून दिली. जागतिक मंचावर आपले विचार परखडपणे मांडले. त्यांचे कार्य अतुलनीय असेच होते, असे आदित्यनाथ म्हणाले. वेदांबाबत अपप्रचार केला गेला. जगासमोर चुकीच्या पद्धतीने त्याची मांडणी केली गेली. असे असताना महेश योगी यांनी ही चूक सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले. भारत, भारतीयत्व, वेदांचं महत्त्व, रामायण, महाभारत याची माहिती प्रभावीपणे त्यांनी मांडली आणि त्याचा प्रसार केला, असे गौरवोद्गारही योगींनी काढले. धर्म सुधारणा निरंतर ही प्रक्रिया आहे. प्रत्येक कालखंडात ही प्रक्रिया चालली पाहिजे. ज्यामुळे समाज कमकुवत होऊ शकतो अशा गोष्टींची डागडुजी व्हायला हवी. तसे झाले नाही तर राष्ट्र कमकुवत होईल, असे महत्त्वाचे विधानही योगींनी केले.
दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकांचे पडघम वाजत असताना अयोध्या आणि राम मंदिर केंद्रस्थानी असणार हे निश्चितच आहे. त्यामुळेच अयोध्येत नेत्यांचे दौरे वाढू लागले असून योगींचा हा दौराही त्यामुळेच चर्चेत राहिला.
वाचा:ओमिक्रॉनवर कोव्हिशील्ड किती प्रभावी?; पूनावाला यांनी दिली आनंदाची बातमी