म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशाच्या चौदाव्या राष्ट्रपतपिदासाठी झालेल्या निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजप-रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद त्यांच्या एकमेव प्रतिस्पर्धी काँग्रेस-यूपीएच्या मीराकुमार यांचा ३ लाख ३४ हजार ३१४ मतांनी पराभव करून मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. राष्ट्रपतपिदी निवडून येणे हा आपल्यासाठी अतिशय भावूक क्षण असल्याची भावना नवनिर्वाचित राष्ट्रपती कोविंद यांनी व्यक्त केली. कोविंद यांचा शपथविधी येत्या २५ जुलै रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार असून भारताचे सरन्यायाधीश जगदीशसिंग केहर त्यांना एका शानदार, छोटेखानी सोहळ्यात राष्ट्रपतपिदाची शपथ देतील.
कच्च्या घरात राहणारी आपल्यासारखी व्यक्ती राष्ट्रपती भवनात गरिबांचा प्रतिनिधी म्हणून जात असल्याची भावना या विजयानंतर कोविंद यांनी व्यक्त केली. खासदार आणि आमदारांनी आपल्यावर व्यक्त केलेल्या विश्वासासाठी कोविंद यांनी आभार व्यक्त केले आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी मीराकुमार यांनाही शुभेच्छा दिल्या. ‘ज्या पदाचा डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या विद्वानांनी गौरव वाढविला, त्या पदासाठी माझी निवड होणे ही बाब माझ्यावरील मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे. हा माझ्यासाठी निश्चितपणे भावूक क्षण आहे, असे ते देशवासियांना संबोधित करताना म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, त्यांच्या प्रतिस्पर्धी मीराकुमार, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी तसेच तमाम केंद्रीय मंत्री आणि भाजप व विविध पक्षांच्या नेत्यांनी कोविंद यांचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्रपतपिदाच्या निवडणुकीत एकूण ७७६ खासदार आणि ४१२० आमदारांना मतदान करायचे होते. मात्र ७६८ खासदार आणि ४०८३ आमदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ७४७ खासदार आणि ४०२७ आमदारांची मते वैध ठरली. त्यांच्या १० लाख ६९ हजार ३५८ मतमूल्यांपैकी कोविंद यांना ७ लाख २ हजार ४४ मते (६५.६५ टक्के) मिळाली, तर मीराकुमार यांना ३ लाख ६७ हजार ३१४ मतांवर (३४.३५ टक्के) समाधान मानावे लागले.
राष्ट्रपतपिदासाठी १७ जुलै रोजी झालेल्या मतदानानंतर विविध राज्यांतून मतपेट्या एकत्र करून संसद भवनात आणण्यात आल्या. संसद भवनात गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेली मतमोजणी चारच्या सुमाराला संपली. सायंकाळी पाच वाजता कोविंद यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कोविंद यांचे दिल्लीतील तात्पुरते निवासस्थान १०, अकबर रोड येथे जाऊन त्यांचे गुलाबाचे फूल देऊन आणि लाडू भरवून अभिनंदन केले. कोविंद यांच्या प्रतिस्पर्धी मीराकुमार यांनी त्यांचे अभिनंदन करताना त्यांच्यावर घटनेच्या रक्षणाची जबाबदारी असल्याचे स्मरण करून दिले. आपल्याला मते देणाऱ्या सर्वांचे आभार मानताना मीराकुमार यांनी ज्या विचारधारेची लढाई लढण्यासाठी आपण निवडणूक लढली ती २० जुलै २०१७ रोजी संपलेली नसून ती पुढेही कायम राहील, अशी ग्वाही दिली.महाराष्ट्रात विरोधकांची १६ मते फुटली.
महाराष्ट्रात विरोधकांची १६ मते फुटली
मुंबई : रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्र विधानसभेतून २०८, तर मीराकुमार यांना ७७ मते मिळाली. कोविंद यांना भाजपची १२२, शिवसेनेची ६३ अशी १८५ मते तसेच सात अपक्ष अशी १९२ मते मिळणे अपेक्षित असताना कोविंद यांना २०८ मते मिळाली आहेत. त्यामुळे या १९२ मतांबरोबर कोविंद यांना आणखी १६ मते काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अन्य विरोधकांची मिळाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांची मते फोडण्यात यश आले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
देशाच्या चौदाव्या राष्ट्रपतपिदासाठी झालेल्या निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजप-रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद त्यांच्या एकमेव प्रतिस्पर्धी काँग्रेस-यूपीएच्या मीराकुमार यांचा ३ लाख ३४ हजार ३१४ मतांनी पराभव करून मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. राष्ट्रपतपिदी निवडून येणे हा आपल्यासाठी अतिशय भावूक क्षण असल्याची भावना नवनिर्वाचित राष्ट्रपती कोविंद यांनी व्यक्त केली. कोविंद यांचा शपथविधी येत्या २५ जुलै रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार असून भारताचे सरन्यायाधीश जगदीशसिंग केहर त्यांना एका शानदार, छोटेखानी सोहळ्यात राष्ट्रपतपिदाची शपथ देतील.
कच्च्या घरात राहणारी आपल्यासारखी व्यक्ती राष्ट्रपती भवनात गरिबांचा प्रतिनिधी म्हणून जात असल्याची भावना या विजयानंतर कोविंद यांनी व्यक्त केली. खासदार आणि आमदारांनी आपल्यावर व्यक्त केलेल्या विश्वासासाठी कोविंद यांनी आभार व्यक्त केले आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी मीराकुमार यांनाही शुभेच्छा दिल्या. ‘ज्या पदाचा डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या विद्वानांनी गौरव वाढविला, त्या पदासाठी माझी निवड होणे ही बाब माझ्यावरील मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे. हा माझ्यासाठी निश्चितपणे भावूक क्षण आहे, असे ते देशवासियांना संबोधित करताना म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, त्यांच्या प्रतिस्पर्धी मीराकुमार, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी तसेच तमाम केंद्रीय मंत्री आणि भाजप व विविध पक्षांच्या नेत्यांनी कोविंद यांचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्रपतपिदाच्या निवडणुकीत एकूण ७७६ खासदार आणि ४१२० आमदारांना मतदान करायचे होते. मात्र ७६८ खासदार आणि ४०८३ आमदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ७४७ खासदार आणि ४०२७ आमदारांची मते वैध ठरली. त्यांच्या १० लाख ६९ हजार ३५८ मतमूल्यांपैकी कोविंद यांना ७ लाख २ हजार ४४ मते (६५.६५ टक्के) मिळाली, तर मीराकुमार यांना ३ लाख ६७ हजार ३१४ मतांवर (३४.३५ टक्के) समाधान मानावे लागले.
राष्ट्रपतपिदासाठी १७ जुलै रोजी झालेल्या मतदानानंतर विविध राज्यांतून मतपेट्या एकत्र करून संसद भवनात आणण्यात आल्या. संसद भवनात गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेली मतमोजणी चारच्या सुमाराला संपली. सायंकाळी पाच वाजता कोविंद यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कोविंद यांचे दिल्लीतील तात्पुरते निवासस्थान १०, अकबर रोड येथे जाऊन त्यांचे गुलाबाचे फूल देऊन आणि लाडू भरवून अभिनंदन केले. कोविंद यांच्या प्रतिस्पर्धी मीराकुमार यांनी त्यांचे अभिनंदन करताना त्यांच्यावर घटनेच्या रक्षणाची जबाबदारी असल्याचे स्मरण करून दिले. आपल्याला मते देणाऱ्या सर्वांचे आभार मानताना मीराकुमार यांनी ज्या विचारधारेची लढाई लढण्यासाठी आपण निवडणूक लढली ती २० जुलै २०१७ रोजी संपलेली नसून ती पुढेही कायम राहील, अशी ग्वाही दिली.महाराष्ट्रात विरोधकांची १६ मते फुटली.
महाराष्ट्रात विरोधकांची १६ मते फुटली
मुंबई : रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्र विधानसभेतून २०८, तर मीराकुमार यांना ७७ मते मिळाली. कोविंद यांना भाजपची १२२, शिवसेनेची ६३ अशी १८५ मते तसेच सात अपक्ष अशी १९२ मते मिळणे अपेक्षित असताना कोविंद यांना २०८ मते मिळाली आहेत. त्यामुळे या १९२ मतांबरोबर कोविंद यांना आणखी १६ मते काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अन्य विरोधकांची मिळाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांची मते फोडण्यात यश आले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.