रांची : झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी स्वतः धुरा हाती घेतली आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये बोलताना अमित शाहांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने अयोध्या प्रकरणात आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. ‘अयोध्येवर आता सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि अयोध्येत आता गगनाला भिडणारं मंदिर बांधू’, अशी घोषणा अमित शाह यांनी केली.
अयोध्येचा निकाल अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार
अमित शाहांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० काढल्याचाही उल्लेख या प्रचारसभेत केला. काँग्रेसने व्होट बँकेच्या नादात देशाला ७० वर्ष अडकून ठेवलं, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० हा कलंक हटवून काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. स्पष्ट बहुमताचं सरकार येताच पहिल्याच अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय मोदींच्या सरकारने घेतला, असं ते म्हणाले.
दरम्यान, झारखंडमध्ये आदिवासी मतं ही निर्णायक असतात. त्यामुळे अमित शाहांनी आदिवासी मतदारांनाही साद घातली. 'केंद्र सरकारने आदिवासींसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात आदिवासींचा सन्मान वाढवण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. सरकारने डिस्ट्रिक्ट मिनरल फंड अंतर्गत आदिवासींसाठी ३२ हजार कोटी रुपये दिले', असं ते म्हणाले.
मला माझी मशीद पुन्हा हवीय; ओवेसींचे ट्विट
'अयोध्येत मंदिर व्हावं असं प्रत्येकाला वाटत होतं. पण काँग्रेसने खटलाच चालू दिला नाही. आम्हालाही वाटायचं की घटनात्मक पद्धतीने हा वाद सुटला जावा, पण एवढ्या वर्षांपासून खटलाच चालत नव्हता. श्रीरामाच्या कृपेने आता सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला आहे आणि त्याच जागेवर भव्य राम मंदिराचा मार्गही मोकळा झाला आहे', असं अमित शाह म्हणाले.
केंद्रातील यापूर्वीच्या यूपीए सरकारवरही अमित शाहांनी हल्लाबोल केला. 'सोनिया-मनमोहन सिंह यांच्या सरकारने १३ व्या वित्त आयोगात झारखंडच्या विकासासाठी ५५ हजार २५३ कोटी रुपये दिले. पण मोदी सरकारने झारखंडसाठी ३ लाख ८ हजार ४८७ कोटी रुपयांचा निधी दिला', असा दावा अमित शाहांनी केला.
अयोध्या निकालानंतर सुटणार २७ वर्षांचा उपवास
अयोध्येचा निकाल अमान्य; मुस्लीम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार
अमित शाहांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० काढल्याचाही उल्लेख या प्रचारसभेत केला. काँग्रेसने व्होट बँकेच्या नादात देशाला ७० वर्ष अडकून ठेवलं, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० हा कलंक हटवून काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. स्पष्ट बहुमताचं सरकार येताच पहिल्याच अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय मोदींच्या सरकारने घेतला, असं ते म्हणाले.
दरम्यान, झारखंडमध्ये आदिवासी मतं ही निर्णायक असतात. त्यामुळे अमित शाहांनी आदिवासी मतदारांनाही साद घातली. 'केंद्र सरकारने आदिवासींसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात आदिवासींचा सन्मान वाढवण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. सरकारने डिस्ट्रिक्ट मिनरल फंड अंतर्गत आदिवासींसाठी ३२ हजार कोटी रुपये दिले', असं ते म्हणाले.
मला माझी मशीद पुन्हा हवीय; ओवेसींचे ट्विट
'अयोध्येत मंदिर व्हावं असं प्रत्येकाला वाटत होतं. पण काँग्रेसने खटलाच चालू दिला नाही. आम्हालाही वाटायचं की घटनात्मक पद्धतीने हा वाद सुटला जावा, पण एवढ्या वर्षांपासून खटलाच चालत नव्हता. श्रीरामाच्या कृपेने आता सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला आहे आणि त्याच जागेवर भव्य राम मंदिराचा मार्गही मोकळा झाला आहे', असं अमित शाह म्हणाले.
केंद्रातील यापूर्वीच्या यूपीए सरकारवरही अमित शाहांनी हल्लाबोल केला. 'सोनिया-मनमोहन सिंह यांच्या सरकारने १३ व्या वित्त आयोगात झारखंडच्या विकासासाठी ५५ हजार २५३ कोटी रुपये दिले. पण मोदी सरकारने झारखंडसाठी ३ लाख ८ हजार ४८७ कोटी रुपयांचा निधी दिला', असा दावा अमित शाहांनी केला.
अयोध्या निकालानंतर सुटणार २७ वर्षांचा उपवास