नवी दिल्ली
पुराने हाहाकार माजलेल्या आसाममध्ये पूरग्रस्तांसाठी चारही दिशांनी मदतीचा ओघ सुरू आहे. सरकारसह अनेक सामाजिक संस्थांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. रामदेव बाबा यांच्या पतंजलीनेदेखील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली; पण त्या सर्व वस्तू एक्सपायरी डेट संपलेल्या होत्या, असा स्थानिकांचा आरोप आहे.
पतंजलीने आसामच्या मजुली जिल्ह्यात सुमारे १२ लाख रुपये किमतीच्या वस्तू पाठवल्या. दूध भुकटी, जूस यासारख्या वस्तूंचाही यात समावेश होता. पण या वस्तू वाटपायोग्य नव्हत्या कारण त्यांची एक्सपायरी डेट निघून गेली होती. पतंजलीने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.
मजुलीचे उपायुक्त पल्लव गोपाल झा यांनी नवभारत टाइम्स डॉट कॉमला सांगितले, 'पतंजलीच्या एक्स्पायरी निघून गेलेल्या वस्तू आल्या होत्या पण जिल्हा प्रशासनाने त्यांचे वाटप करण्याची परवानगी दिली नाही.' मात्र हे सामान पूरग्रस्तांना वाटलं गेल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सहाय्यक उपायुक्त चिन्मय नाथ यांना सोपवली आहे.
पुराने हाहाकार माजलेल्या आसाममध्ये पूरग्रस्तांसाठी चारही दिशांनी मदतीचा ओघ सुरू आहे. सरकारसह अनेक सामाजिक संस्थांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. रामदेव बाबा यांच्या पतंजलीनेदेखील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली; पण त्या सर्व वस्तू एक्सपायरी डेट संपलेल्या होत्या, असा स्थानिकांचा आरोप आहे.
पतंजलीने आसामच्या मजुली जिल्ह्यात सुमारे १२ लाख रुपये किमतीच्या वस्तू पाठवल्या. दूध भुकटी, जूस यासारख्या वस्तूंचाही यात समावेश होता. पण या वस्तू वाटपायोग्य नव्हत्या कारण त्यांची एक्सपायरी डेट निघून गेली होती. पतंजलीने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.
मजुलीचे उपायुक्त पल्लव गोपाल झा यांनी नवभारत टाइम्स डॉट कॉमला सांगितले, 'पतंजलीच्या एक्स्पायरी निघून गेलेल्या वस्तू आल्या होत्या पण जिल्हा प्रशासनाने त्यांचे वाटप करण्याची परवानगी दिली नाही.' मात्र हे सामान पूरग्रस्तांना वाटलं गेल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सहाय्यक उपायुक्त चिन्मय नाथ यांना सोपवली आहे.