नवी दिल्ली/केवडिया: राष्ट्रीय एकता दिनानिमित्त (Rashtriya Ekta Diwas) संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दहशतवादाचे (Terrorism) समर्थन करणाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ यूनिटी (Statue Of Unity) येथे संबोधित करताना त्यांनी फ्रान्समधील घटनेचा उल्लेख केला न करता त्यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ज्या प्रकारे आज लोक दहशतवादाचे समर्थन करण्यासाठी खुलेपणाने पुढे येत आहेत, तो आज एक जागतिक चिंतेचा विषय बनला आहे, असे मोदी म्हणाले. जगभरातील सर्वच देशांच्या सरकारांनी दहशतवादाविरोधात एकजूट होण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे मोदी म्हणाले. दहशतवाद आणि हिंसेने कधीही कोणाचेही कल्याण होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.
'सीमांवर नजर आणि दृष्टीकोन बदलला'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी परेडमध्ये भाग घेतला. आत्मनिर्भर देशच आपल्या प्रगतीसोबत आपल्या सुरक्षेसाठी आश्वस्त राहू शकतो. म्हणून, आज देश संरक्षणाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याकडे जात आहे. इतकेच नाही, तर सीमांवरील देखील भारताची नजर आणि दृष्टीकोन बदलत आहे, असे मोदी म्हणाले. आज भारताच्या भूमीवर नजर वर करून पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळत आहे. आजचा भारत सीमांवर शेकडो किलोमीटर लांब रस्ते बनत आहेत. अनेक पूल तयार होत आहेत, अनेक भुयारी मार्ग बनत आहेत, असेही मोदी पुढे म्हणाले.
'दहशतवादाचे खुलेपणाने समर्थन होणे चिंतेची बाब'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचा थेट उल्लेख केला नाही. मात्र अप्रत्यक्षपणे त्यांनी अशा घटनांना योग्य ठरवणाऱ्यांवर टीकेचे जोरदार प्रहार केले. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अनेक देशांमध्ये वेगळी परिस्थिती तयार झाली आहे, काही लोक दहशतवादाच्या समर्थनासाठी खुलेपणाने पुढे येत आहेत, ही आज जागतिक चिंतेची बाब बनली आहे. आजच्या वातावरणात जगातील सर्व देशांनी, सर्व देशांच्या सरकारांनी सर्व धर्मांच्या लोकांनी दहशतवादाविरोधात एकजूट होण्याची अधिक आवश्यकता आहे. शांती, बंधुभाव आणि परस्पर आदराची भावना हीच मानवतेची खरी ओळख आहे. दहशतवाद आणि हिंसेने कधीही, कोणाचेही कल्याण होऊ शकत नाही, असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
क्लिक करा आणि पाहा- राष्ट्रीय एकता दिवस Live: पुलवामा हल्ल्यासंदर्भात मोदींची विरोधकांवर मोठी टीका
भडकावणाऱ्यांपासून सावध राहा- मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सांस्कृतिक विविधतेचा उल्लेख करत जनतेला सावध केले. भडकावणाऱ्या शक्तींपासून सावध राहा, असे मोदी म्हणाले. आमची विविधताच आमचे अस्तित्व आहे. मात्र, भारताची ही एकता , ही शक्ती दुसऱ्यांना खटकत असते. आमच्या विविधतेलाच ते आमचा दुबळेपणा समजतात. मात्र अशा शक्ती ओळखण्याची आवश्यकता आहे, सावध राहण्याची गरज आहे, असे मोदी पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- PM मोदींनी गुजरातला दिली जंगल सफारीची भेट, सेल्फी पॉइंटचे केले उद्घाटन
क्लिक करा आणि वाचा- मोठा दिलासा; देशात ५० टक्क्यांनी कमी होतेय करोना रुग्णवाढundefined
'सीमांवर नजर आणि दृष्टीकोन बदलला'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी परेडमध्ये भाग घेतला. आत्मनिर्भर देशच आपल्या प्रगतीसोबत आपल्या सुरक्षेसाठी आश्वस्त राहू शकतो. म्हणून, आज देश संरक्षणाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्याकडे जात आहे. इतकेच नाही, तर सीमांवरील देखील भारताची नजर आणि दृष्टीकोन बदलत आहे, असे मोदी म्हणाले. आज भारताच्या भूमीवर नजर वर करून पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळत आहे. आजचा भारत सीमांवर शेकडो किलोमीटर लांब रस्ते बनत आहेत. अनेक पूल तयार होत आहेत, अनेक भुयारी मार्ग बनत आहेत, असेही मोदी पुढे म्हणाले.
'दहशतवादाचे खुलेपणाने समर्थन होणे चिंतेची बाब'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचा थेट उल्लेख केला नाही. मात्र अप्रत्यक्षपणे त्यांनी अशा घटनांना योग्य ठरवणाऱ्यांवर टीकेचे जोरदार प्रहार केले. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अनेक देशांमध्ये वेगळी परिस्थिती तयार झाली आहे, काही लोक दहशतवादाच्या समर्थनासाठी खुलेपणाने पुढे येत आहेत, ही आज जागतिक चिंतेची बाब बनली आहे. आजच्या वातावरणात जगातील सर्व देशांनी, सर्व देशांच्या सरकारांनी सर्व धर्मांच्या लोकांनी दहशतवादाविरोधात एकजूट होण्याची अधिक आवश्यकता आहे. शांती, बंधुभाव आणि परस्पर आदराची भावना हीच मानवतेची खरी ओळख आहे. दहशतवाद आणि हिंसेने कधीही, कोणाचेही कल्याण होऊ शकत नाही, असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
क्लिक करा आणि पाहा- राष्ट्रीय एकता दिवस Live: पुलवामा हल्ल्यासंदर्भात मोदींची विरोधकांवर मोठी टीका
भडकावणाऱ्यांपासून सावध राहा- मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सांस्कृतिक विविधतेचा उल्लेख करत जनतेला सावध केले. भडकावणाऱ्या शक्तींपासून सावध राहा, असे मोदी म्हणाले. आमची विविधताच आमचे अस्तित्व आहे. मात्र, भारताची ही एकता , ही शक्ती दुसऱ्यांना खटकत असते. आमच्या विविधतेलाच ते आमचा दुबळेपणा समजतात. मात्र अशा शक्ती ओळखण्याची आवश्यकता आहे, सावध राहण्याची गरज आहे, असे मोदी पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- PM मोदींनी गुजरातला दिली जंगल सफारीची भेट, सेल्फी पॉइंटचे केले उद्घाटन
क्लिक करा आणि वाचा- मोठा दिलासा; देशात ५० टक्क्यांनी कमी होतेय करोना रुग्णवाढundefined