अ‍ॅपशहर

बँकांमध्ये गुंतवणुकदारांचा पैसा सुरक्षित; RBI चं आश्वासन

देशातील सगळ्या बँकांतील खातेधारकांचा पैसा अगदी सुरक्षित आहे आणि आरबीआयची सगळ्या बँकांच्या कारभारावर चोख नजर आहे, असा दिलासा आरबीआयनं गुंतवणुकदारांना दिलाय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Mar 2020, 9:16 pm

वाचा : YES बँक: पळपुट्या रोशनी कपूरला विमानतळावरच रोखलं

नवी दिल्ली : येस बँक घोटाळा समोर आल्यानंतर देशातील गुंतवणुकदारांचा बँकिंग यंत्रणेवरचा विश्वासच उडाल्यासारखा झालाय. त्यामुळे, वेगवेगळ्या अफवांनाही ऊत आला आहे. याच अफवा रोखण्यासाठी आणि देशातील गुंतवणुकदारांना दिलासा देण्यासाठी खुद्द 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ला (आरबीआय) पुढे यावं लागलंय. देशातील सगळ्या बँकांतील खातेधारकांचा पैसा अगदी सुरक्षित आहे आणि आरबीआयची सगळ्या बँकांच्या कारभारावर चोख नजर आहे, असा दिलासा आरबीआयनं गुंतवणुकदारांना दिलाय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम आरबीआय



बँक खात्यात जमा असलेल्या पैशांबद्दल नागरिकांच्या मनात चिंता आणि गोंधळाचं वातावरण तयार झालंय. परंतु, चुकीच्या माहितीमुळे हे संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. खातेधारकांच्या काही बँकांमध्ये जमा असलेल्या पैशाच्या सुरक्षिततेबद्दल मीडियामध्ये चिंता व्यक्त करण्यात येतेय. पण रिझर्व्ह बँक सर्व बँकांवर देखरेख ठेवते आणि म्हणूनच सर्व खातेधाराकांना आम्ही आश्वस्त करतो की गुंतवणुकदारांनी आपली कोणत्याही बँकेत जमा असलेल्या गुंतवणुकीच्या सुरक्षिततेबद्दल खात्री बाळगावी, असं म्हणत आरबीआयनं नागरिकांना आश्वस्त केलंय.

वाचा : येस बँक घोटाळ्याचं इक्बाल मिर्ची; डीएचएफएलशी कनेक्शन?


यापूर्वी, मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनीही असंच म्हटलं होतं. भारतीय बँकांचा पायाभूत आधार मजबूत आहे त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही बँकेचं स्वास्थ्य त्या बँकेच्या बाजार भांडवलावरून किंवा ठेवी प्रमाणावरून ठरत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.

चा : 'ED'कडून राणा कपूर यांची कसून चौकशी

वाचा : YES बँंक:डिजिटल सेवा ठप्प,खातेदारांची कोंडी

वाचा : SBI तारणार YES बॅंकेला; दोन दिवसांत आराखडा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज