अ‍ॅपशहर

'अरविंद केजरीवाल; निदान देवाला तरी घाबर'

दिल्लीचे बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण सुरू केलेले असतानाच आता मिश्रा यांच्या आईनेही केजरीवाल यांना भावनिक पत्र लिहून चार गोष्टी सुनावल्या आहेत. 'माझा मुलगा जिद्दी आहे. त्याला तू ओळखले नाहीस. त्याच्या प्रश्नांची उत्तरे दे. तो कुणाचा एजंट नाही, तर तो सत्याचा एजंट आहे. असला खोटारडेपणा तुझ्या कामाला येणार नाही, निदान देवाला तरी घाबर,' अशा शब्दात कपिल मिश्रा यांच्या आईने केजरीवाल यांना सुनावले आहे.

Maharashtra Times 12 May 2017, 12:10 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम read full letter of kapil mishras mother to delhi cm arvind kejriwal
'अरविंद केजरीवाल; निदान देवाला तरी घाबर'


दिल्लीचे बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण सुरू केलेले असतानाच आता मिश्रा यांच्या आईनेही केजरीवाल यांना भावनिक पत्र लिहून चार गोष्टी सुनावल्या आहेत. 'माझा मुलगा जिद्दी आहे. त्याला तू ओळखले नाहीस. त्याच्या प्रश्नांची उत्तरे दे. तो कुणाचा एजंट नाही, तर तो सत्याचा एजंट आहे. असला खोटारडेपणा तुझ्या कामाला येणार नाही, निदान देवाला तरी घाबर,' अशा शब्दात कपिल मिश्रा यांच्या आईने केजरीवाल यांना सुनावले आहे.

कपिल मिश्रा यांची आई डॉ. अन्नपूर्णा मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या या पत्रात केजरीवाल यांना चळवळीच्या दिवसांची आठवण करून देतानाच त्यांच्यातील झालेल्या बदलाकडेही त्यांचे लक्ष वेधले आहे. माझा मुलगा तुला प्रश्न विचारेन आणि त्या प्रश्नांची उत्तरे देण्यापासून तू पळ काढशील अशी कल्पना कधी केली नव्हती, असे सांगतानाच तू जेंव्हा जेंव्हा घरी यायचास तेंव्हा तेंव्हा सार्वजनिक जीवनातील पारदर्शितेचा आग्रह धरायचास आणि आज माझ्या मुलाला भाजपचा एजंट म्हणून संभावना केली जात आहे. ज्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेस, त्या कार्यक्रमाला तुझ्यासहित तुझं अख्ख मंत्रिमंडळही उपस्थित होतं. मग एकट्या कपिलचेच फोटो व्हायरल करून त्याला भाजपचा एजंट का ठरवले जात आहे? असा सवाल अन्नपूर्णा मिश्रा यांनी केला आहे.

माझ्या मुलाला केवळ आंदोलन करायचे होते. पण तूच त्याला त्याची इच्छा नसताना निवडणूक लढवायला भाग पाडलेस आणि आज त्याच्यावर आरोप केले जात आहेत. जेंव्हा तुझ्या पक्षाची स्थापनाही झाली नव्हती तेंव्हा तुझी पहिली सभा मीच आयोजित केली होती, हे विसरलास का?, असं सांगतानाच माझा मुलगा जिद्दी आहे. तीन दिवसापासून त्याने काही खाल्लेलं नाही आणि अशा मुलाला जन्म दिल्याचा मला अभिमान आहे, असंही त्यांनी या पत्रात शेवटी नमूद केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज