वृत्तसंस्था, जम्मू 'जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता माजविण्याचा पाकिस्तानचा कट उधळण्यास सुरक्षा दले सज्ज आहेत,' अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राम माधव यांनी शनिवारी येथे दिली. 'काश्मीरबाहेरच्या लोकांना लक्ष्य करून दहशतवादी काश्मिरीयतचे नुकसान करीत आहेत,' असेही माधव म्हणाले. काश्मीरच्या विलिनीकरण दिनानिमित्त भाजपच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. 'राज्यातील कलम ३७० हटविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय हेतूने अथवा आदर्शवादी भावनेतून नव्हे, तर अत्यंत विचारपूर्वक घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तो मागे घेतला जाणार नाही,' असे राम माधव यांनी सांगितले. 'जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या व्यावसायिकांना घाबरविण्याचा प्रयत्न दहशतवादी करीत आहेत. मात्र, अशाने ते काश्मिरीयतची आणि काश्मिरी जनतेच्या हिताची हानी करीत आहेत.'
पाकचा कट उधळण्यास सज्ज
वृत्तसंस्था, जम्मू 'जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता माजविण्याचा पाकिस्तानचा कट उधळण्यास सुरक्षा दले सज्ज आहेत,' अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Oct 2019, 4:00 am