नवी दिल्ली:
आजचा हा विजय कुठल्या पक्षाचा, नेत्याचा नसून देशाचा आहे. कोणी विजयी झालं आहे तर तो भारत देश, भारताची लोकशाही विजयी झाली आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आपल्या विजयाबद्दल देशाच्या जनतेचे आभार मानले.
भाजपाच्या विजयानंतर आज सायंकाळी पक्ष मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. नरेंद्र मोदी म्हणाले, '२०१९ लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही नव्या भारतासाठी जनादेश घेण्यासाठी गेलो होतो. देशातल्या कोटी कोटी नागरिकांनी या फकिराची झोळी भरली. भारताच्या १२० कोटी नागरिकांचं मी माथा झुकवून नमन करतो. लोकशाहीच्या विश्वात मतदानाची ही आकडेवारी हीच एक ऐतिहासिक घटना आहे. देश स्वतंत्र झाला. लोकसभेच्या इतक्या निवडणुका झाल्या. पण स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक मतदान या निवडणुकीत झालं, तेही ४० -४२ अंश सेल्सिअस तापमान असताना. हे मतदारांची जागरुकता, लोकशाहीसाठी लोकांची प्रतिबद्धता दाखवून देते. भारताच्या लोकशाहीची ही ताकद जगाने ओळखायला हवी. या लोकशाहीच्या उत्सवात लोकशाहीसाठी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं आहे, जे जखमी झालेत त्यांच्या कुटुंबीयांसाठी माझी सहवेदना प्रकट करतो. लोकशाहीच्या इतिसात लोकशाहीसाठी प्राण देणं येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल.'
निवडणूक आयोगाचेही मोदींनी आभार मानले. निवडणूक आयोग, सुरक्षा दलांना, ही निवडणुकीची व्यवस्था सांभाळणाऱ्या प्रत्येकाला उत्तम प्रकारे निवडणूक प्रक्रिया पार पाडल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो, असं ते म्हणाले.
विजय जनतेचा
'महाभारताचं युद्ध समाप्त झालं तेव्हा श्रीकृष्णाला विचारलं गेलं की तुम्ही कोणत्या बाजूचे होतात. तेव्हा श्रीकृष्णाने जे उत्तर दिलं ते आज जनतेने श्रीकृष्णाच्या रुपात दिलं आहे.
श्रीकृष्णाने उत्तर दिलं की मी हस्तिनापूरच्या बाजूने उभा होतो. आज देशाचे नागरिक भारतासाठी उभे होते, त्यांनी भारतासाठी मतदान केलं. देशाच्या नागरिकांची ही भावना भारताच्या विकासाची गॅरंटी आहे. ही निवडणूक कोणता पक्ष, कोणता नेता लढत नव्हता, ही निवडणूक देशाची जनता लढत होती. माझ्या त्या भावनेला आज जनतेनं प्रकट केलं. जर कोणी विजयी झालं असेल तर भारत विजयी झाला आहे, लोकशाही विजयी झाली आहे,' अशा शब्दात मोदींनी जनतेचे आभार व्यक्त केले.
शरीराचा प्रत्येक कण देशवासियांसाठी
'२०१४ ला तुम्ही मला जास्त ओळखत नव्हता तरी माझ्यावर विश्वास ठेवला. २०१९ मध्ये मला जाणून घेऊन तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. यामागची भावना मला समजते. देशाच्या जनतेने माझ्यावर विश्वास दाखवलाय त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. एनडीएच्या घटकपक्षांनीही माझी मदत केली आहे. म्हणून मला आज देशवासियांना सांगायचं आहे की पुढेही मी वाईट ईराद्याने, वाईट नियतीने कुठलंही काम करणार नाही. काम करताना चूक होऊ शकते, पण वाईट हेतूने मी कुठलंही काम करणार नाही. दुसरं असं की मी माझ्यासाठी काहीही करणार नाही. तिसरी गोष्ट अशी की माझ्या कार्यकाळातला प्रत्येक क्षण, माझ्या शरीराचा प्रत्येक कण देशवासियांसाठी असेल. तुम्ही जेव्हा जेव्हा माझं मूल्यांकन कराल तेव्हा तेव्हा ते या तीन निकषांवर करा. मी चुकलो तर सांगा, टीका करा.'
आजचा हा विजय कुठल्या पक्षाचा, नेत्याचा नसून देशाचा आहे. कोणी विजयी झालं आहे तर तो भारत देश, भारताची लोकशाही विजयी झाली आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आपल्या विजयाबद्दल देशाच्या जनतेचे आभार मानले.
भाजपाच्या विजयानंतर आज सायंकाळी पक्ष मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. नरेंद्र मोदी म्हणाले, '२०१९ लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही नव्या भारतासाठी जनादेश घेण्यासाठी गेलो होतो. देशातल्या कोटी कोटी नागरिकांनी या फकिराची झोळी भरली. भारताच्या १२० कोटी नागरिकांचं मी माथा झुकवून नमन करतो. लोकशाहीच्या विश्वात मतदानाची ही आकडेवारी हीच एक ऐतिहासिक घटना आहे. देश स्वतंत्र झाला. लोकसभेच्या इतक्या निवडणुका झाल्या. पण स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक मतदान या निवडणुकीत झालं, तेही ४० -४२ अंश सेल्सिअस तापमान असताना. हे मतदारांची जागरुकता, लोकशाहीसाठी लोकांची प्रतिबद्धता दाखवून देते. भारताच्या लोकशाहीची ही ताकद जगाने ओळखायला हवी. या लोकशाहीच्या उत्सवात लोकशाहीसाठी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिलं आहे, जे जखमी झालेत त्यांच्या कुटुंबीयांसाठी माझी सहवेदना प्रकट करतो. लोकशाहीच्या इतिसात लोकशाहीसाठी प्राण देणं येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल.'
निवडणूक आयोगाचेही मोदींनी आभार मानले. निवडणूक आयोग, सुरक्षा दलांना, ही निवडणुकीची व्यवस्था सांभाळणाऱ्या प्रत्येकाला उत्तम प्रकारे निवडणूक प्रक्रिया पार पाडल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो, असं ते म्हणाले.
विजय जनतेचा
'महाभारताचं युद्ध समाप्त झालं तेव्हा श्रीकृष्णाला विचारलं गेलं की तुम्ही कोणत्या बाजूचे होतात. तेव्हा श्रीकृष्णाने जे उत्तर दिलं ते आज जनतेने श्रीकृष्णाच्या रुपात दिलं आहे.
श्रीकृष्णाने उत्तर दिलं की मी हस्तिनापूरच्या बाजूने उभा होतो. आज देशाचे नागरिक भारतासाठी उभे होते, त्यांनी भारतासाठी मतदान केलं. देशाच्या नागरिकांची ही भावना भारताच्या विकासाची गॅरंटी आहे. ही निवडणूक कोणता पक्ष, कोणता नेता लढत नव्हता, ही निवडणूक देशाची जनता लढत होती. माझ्या त्या भावनेला आज जनतेनं प्रकट केलं. जर कोणी विजयी झालं असेल तर भारत विजयी झाला आहे, लोकशाही विजयी झाली आहे,' अशा शब्दात मोदींनी जनतेचे आभार व्यक्त केले.
शरीराचा प्रत्येक कण देशवासियांसाठी
'२०१४ ला तुम्ही मला जास्त ओळखत नव्हता तरी माझ्यावर विश्वास ठेवला. २०१९ मध्ये मला जाणून घेऊन तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. यामागची भावना मला समजते. देशाच्या जनतेने माझ्यावर विश्वास दाखवलाय त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. एनडीएच्या घटकपक्षांनीही माझी मदत केली आहे. म्हणून मला आज देशवासियांना सांगायचं आहे की पुढेही मी वाईट ईराद्याने, वाईट नियतीने कुठलंही काम करणार नाही. काम करताना चूक होऊ शकते, पण वाईट हेतूने मी कुठलंही काम करणार नाही. दुसरं असं की मी माझ्यासाठी काहीही करणार नाही. तिसरी गोष्ट अशी की माझ्या कार्यकाळातला प्रत्येक क्षण, माझ्या शरीराचा प्रत्येक कण देशवासियांसाठी असेल. तुम्ही जेव्हा जेव्हा माझं मूल्यांकन कराल तेव्हा तेव्हा ते या तीन निकषांवर करा. मी चुकलो तर सांगा, टीका करा.'