अ‍ॅपशहर

कोरेगाव भीमा प्रकरणात निकाल राखीव

कोरेगाव भीमा प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने ९० दिवसांपेक्षा अधिक मुदत देण्याची विनंती ...

Maharashtra Times 11 Jan 2019, 4:00 am
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम supreme


कोरेगाव भीमा प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने ९० दिवसांपेक्षा अधिक मुदत देण्याची विनंती फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला आव्हान देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवला.

'दोन्ही पक्षांच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकून झाल्यानंतरच निकाल दिला जाईल,' असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले. कोरेगाव भीमा प्रकरणात ९० दिवसांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. या मुदतीला आणखी ९० दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. या प्रकरणात पोलिसांनी एका स्थानिक न्यायालयासमोर यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज